आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये वाढीव आरक्षण देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.  या बैठकीत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षण मंत्री दादा भुसे आदिवासी मंत्री अशोक उईके, इतर मागासवर्गिय आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे उपस्थित होते.





राज्यातील पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.या भागातील आदिवासींसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण वाढवण्याची गरज आहे. यासाठी सध्या ही बैठक घेण्यात आली आणि याबाबत सोशल मीडियावर स्वतः बावनकुळे यांनी पोस्ट करत सांगितले आहे. तसंच याबाबत प्रस्ताव आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठवण्यात आला आहे. ही दुसरी बैठक झाल्याचेही सांगण्यात येत आहे.


आदिवासी समाजाला आरक्षण आणि इतर मागासवर्गीय, पारंपरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग,  यांचे आरक्षण काही प्रमाणात कमी करुन आदिवासी समाजाला ते आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. राज्य सरकार मंत्रिमंडळ समितीची दुसरी बैठक झाली.


आदिवासी समाजाला आरक्षण देताना एसईबीसी आणि ओबीसी यांचे आरक्षण कमी करु नये असे  छगन भुजबळ यांनी सुचवले आहे. त्याच वेळी, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही बैठकीत आपले विचार मांडले. सर्व सदस्यांच्या मतांचा विचार करून आता या विषयावरील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

.
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती