अभिनेता सलमान खान बनला दिल्ली फ्रँचायझीचा मालक

नवी दिल्ली : देशातील पहिली आणि सर्वात मोठी टेनिस बॉल टी-१० क्रिकेट लीग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामापूर्वी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आता आयएसपीएल मधील नवी दिल्ली फ्रेंचायझीचे मालक असणार आहेत. ही नवी टीम आयएसपीएल मध्ये अशा वेळी सामील झाली आहे, जेव्हा या लीगने आपल्या दुसऱ्या हंगामात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आयएसपीएल हंगाम २ ने टीव्हीवर २.८ कोटींहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि पहिल्या सीझनच्या तुलनेत ४७ टक्के वाढ झाली. यामुळे आयएसपीएल मधील रोमांच वाढला आहे.


सलमान खानच्या सामील होण्यामुळे केवळ नवी दिल्ली संघच बळकट होणार नाही, तर संपूर्ण लीगला एक नवीन ओळख मिळणार आहे. आता तो अशा सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांच्याकडे आधीच इतर आयएसपीएल संघ आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन (माझी मुंबई), सैफ अली खान आणि करीना कपूर खान (टायगर्स ऑफ कोलकाता), अक्षय कुमार (श्रीनगर के वीर), सूर्या (चेन्नई सिंघम्स), हृतिक रोशन (बंगलोर स्ट्रायकर्स) आणि राम चरण (फाल्कन रायझर्स हैदराबाद) अशी नावे आहेत. अभिनेता सलमान खान यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, क्रिकेट ही प्रत्येक भारतीय गल्लीची ओळख आहे. आणि जेव्हा हीच ऊर्जा स्टेडियमपर्यंत पोहोचते, तेव्हा आयएसपीएल सारख्या लीगचा जन्म होतो. मी कायमच क्रिकेटबद्दल अत्यंत उत्साही राहिलो आहे आणि आता आयएसपीएल सोबत जोडला गेल्याचा मला खूप आनंद आहे. ही लीग केवळ स्थानिक स्तरावरचा क्रिकेट पुढे नेत नाही, तर प्रतिभावान खेळाडूंना एक मजबूत आणि व्यापक मंच देखील उपलब्ध करून देते. ही तर फक्त सुरुवात आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत