"आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली," आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

मुंबई : आणीबाणीत संर्घष करणाऱ्याला स्मरणार्थ ५० वर्ष पूर्ण झालेले असून मुंबई येथे संविधान हत्या दिन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील आठवणी सांगताना भावूक होताना पाहायाला मिळाले. त्याकाळी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपविण्यात आले होते. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन त्याकाळी सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले होते. काही लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. ज्यांची लग्न झालेली नव्हती, त्यांची कुटुंब नियोजनाची ऑपरेशन करण्यात आलेली होती. आणीबाणीच्या काळात अनेक कुटुंब उद्धवस्त करण्यात आली. आणीबाणीच्या काळात नेमकं काय चाललंय, तुम्हाला माहिती होऊ नये यासाठी वृत्तपत्रांवर निर्बंध आणले गेले.


भारताची लोकशाही जिवंत आहे... 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  "अलीकडे कुणीही उठतं आणि लोकशाहीबद्दल बोलत असतं. लोकशाहीची गळचेपी, लोकशाहीची हत्या केली जाते असं सांगितलं जातं. भारतातमध्ये कुठल्याही चौकात उभे राहून तुम्ही पंतप्रधानांना शिव्या देऊ शकता, तरीही तुमच्यावर कारवाई केली जात नाही, त्याच कारण म्हणजे आम्ही लोकशाही जिवंत ठेवली. कारण त्याकाळी आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली...


आणीबाणीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी काय महत्वाची भूमिका पार पाडली याची आठवण करुन देताना मुख्यमंत्री म्हणाले, "आणिबाणीच्या काळात पाकिस्तानशी युद्ध झाले होते.  त्यावेळी जनसंघ म्हणून इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती. आणीबाणी उठल्यानंतर रामलीला मैदानावर जंगी सभा झाली त्या सभेत इंदिरा गांधी मुर्दाबाद, अटलबिहारी वाजपेयी जिंदाबाद, अशा घोषणा झाल्यानंतर अटलजींनी तो जमाव शांत केला." आणीबाणीत जनसंघाने कशी परिस्थिती हाताळली याची आठवण सांगताना मुख्यमंत्री भावूक झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थिती होते.


Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील