"आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली," आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

मुंबई : आणीबाणीत संर्घष करणाऱ्याला स्मरणार्थ ५० वर्ष पूर्ण झालेले असून मुंबई येथे संविधान हत्या दिन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील आठवणी सांगताना भावूक होताना पाहायाला मिळाले. त्याकाळी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपविण्यात आले होते. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन त्याकाळी सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले होते. काही लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. ज्यांची लग्न झालेली नव्हती, त्यांची कुटुंब नियोजनाची ऑपरेशन करण्यात आलेली होती. आणीबाणीच्या काळात अनेक कुटुंब उद्धवस्त करण्यात आली. आणीबाणीच्या काळात नेमकं काय चाललंय, तुम्हाला माहिती होऊ नये यासाठी वृत्तपत्रांवर निर्बंध आणले गेले.


भारताची लोकशाही जिवंत आहे... 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  "अलीकडे कुणीही उठतं आणि लोकशाहीबद्दल बोलत असतं. लोकशाहीची गळचेपी, लोकशाहीची हत्या केली जाते असं सांगितलं जातं. भारतातमध्ये कुठल्याही चौकात उभे राहून तुम्ही पंतप्रधानांना शिव्या देऊ शकता, तरीही तुमच्यावर कारवाई केली जात नाही, त्याच कारण म्हणजे आम्ही लोकशाही जिवंत ठेवली. कारण त्याकाळी आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली...


आणीबाणीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी काय महत्वाची भूमिका पार पाडली याची आठवण करुन देताना मुख्यमंत्री म्हणाले, "आणिबाणीच्या काळात पाकिस्तानशी युद्ध झाले होते.  त्यावेळी जनसंघ म्हणून इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती. आणीबाणी उठल्यानंतर रामलीला मैदानावर जंगी सभा झाली त्या सभेत इंदिरा गांधी मुर्दाबाद, अटलबिहारी वाजपेयी जिंदाबाद, अशा घोषणा झाल्यानंतर अटलजींनी तो जमाव शांत केला." आणीबाणीत जनसंघाने कशी परिस्थिती हाताळली याची आठवण सांगताना मुख्यमंत्री भावूक झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थिती होते.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या