"आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली," आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

मुंबई : आणीबाणीत संर्घष करणाऱ्याला स्मरणार्थ ५० वर्ष पूर्ण झालेले असून मुंबई येथे संविधान हत्या दिन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील आठवणी सांगताना भावूक होताना पाहायाला मिळाले. त्याकाळी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपविण्यात आले होते. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन त्याकाळी सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले होते. काही लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. ज्यांची लग्न झालेली नव्हती, त्यांची कुटुंब नियोजनाची ऑपरेशन करण्यात आलेली होती. आणीबाणीच्या काळात अनेक कुटुंब उद्धवस्त करण्यात आली. आणीबाणीच्या काळात नेमकं काय चाललंय, तुम्हाला माहिती होऊ नये यासाठी वृत्तपत्रांवर निर्बंध आणले गेले.


भारताची लोकशाही जिवंत आहे... 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  "अलीकडे कुणीही उठतं आणि लोकशाहीबद्दल बोलत असतं. लोकशाहीची गळचेपी, लोकशाहीची हत्या केली जाते असं सांगितलं जातं. भारतातमध्ये कुठल्याही चौकात उभे राहून तुम्ही पंतप्रधानांना शिव्या देऊ शकता, तरीही तुमच्यावर कारवाई केली जात नाही, त्याच कारण म्हणजे आम्ही लोकशाही जिवंत ठेवली. कारण त्याकाळी आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली...


आणीबाणीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी काय महत्वाची भूमिका पार पाडली याची आठवण करुन देताना मुख्यमंत्री म्हणाले, "आणिबाणीच्या काळात पाकिस्तानशी युद्ध झाले होते.  त्यावेळी जनसंघ म्हणून इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती. आणीबाणी उठल्यानंतर रामलीला मैदानावर जंगी सभा झाली त्या सभेत इंदिरा गांधी मुर्दाबाद, अटलबिहारी वाजपेयी जिंदाबाद, अशा घोषणा झाल्यानंतर अटलजींनी तो जमाव शांत केला." आणीबाणीत जनसंघाने कशी परिस्थिती हाताळली याची आठवण सांगताना मुख्यमंत्री भावूक झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थिती होते.


Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन