उसळीतील कोंथिबीर वडी

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे


महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात कोथिंबीर वडी ही एक झणझणीत, कुरकुरीत आणि सगळ्यांच्या आवडीची पारंपरिक डिश आहे. बहुतेक वेळा वड्या खाऊन उरतात आणि मग त्या कशा वापरायच्या, असा प्रश्न पडतो. अशावेळी आजी-आईंच्या स्वयंपाकघरातून आलेली एक सुंदर कल्पना म्हणजे – उरलेल्या कोथिंबीर वड्यांची झणझणीत उसळ! ‘उसळीतील कोंथिबीर वडी’ ही गावाकडची आणि विस्मरणात गेलेली मस्त झणझणीत रेसिपी आहे.


साहित्य


५-६ उरलेल्या कोथिंबीर वड्या (कापून)
१ मध्यम कांदा (बारीक चिरून)
२ टेबलस्पून ओले खोबरे (ऐच्छिक)
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला / गरम मसाला
१ टीस्पून गूळ
१ चमचा तेल
मीठ चवीनुसार
पाणी – १ कप
कोथिंबीर सजावटीसाठी


‍कृती 


कढईत तेल गरम करून मोहरी टाका. मोहरी तडतडली की आलं-लसूण पेस्ट टाका आणि ३० सेकंद परतवा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवा. हळद, तिखट, गोडा मसाला घालून नीट परतवा. १ कप पाणी आणि गूळ (ऐच्छिक आहे)घालून उकळी आणा. मीठ चवीनुसार टाका. उकळी आली की त्यात कापलेल्या कोथिंबीर वड्या घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटं शिजू द्या, जेणेकरून वड्या रस्सा पिऊन मऊ होतील. वरून कोथिंबीर व खोबरं घाला. झाकण ठेवून २ मिनिटं वाफ येऊ द्या.


टीप : ही उसळ थोडी पातळ ठेवली तर कोथिंबीर वड्या रस्सा छान वाटतो. हवे असल्यास थोडे भरड दाणे घालून चव अजून वाढवता येते.

Comments
Add Comment

रेस्क्यू मिशन

सीमा मालाणी मी व माझी मैत्रीण रोज फिरायला जात असू . बोलायला विषयांचा तोटा नव्हता. दोघीही पुस्तकवेड्या असल्यामुळे

महाराष्ट्रीय साड्या

महाराष्ट्रीय साड्या या राज्याच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचा जिवंत पुरावा आहेत. नाजूक जरीकामासाठी ओळखली

साध्वी : मिस इंडिया २०२६

सौंदर्य आणि प्रतिभेसाठी भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठ असलेल्या 'मिस इंडिया'च्या ६१ व्या पर्वाचा नुकतेच

आठवणींच्या मैफलीत

आशय : वीणा सानेकर डहाणू जवळ ऐने नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात वसलेल्या स्नेहनगरीत जाण्याचा योग नुकताच आला. एका

स्त्रीस्वभाव : कोमलतेत दडलेली भावविश्वाची समृद्धी

निशा वर्तक “स्त्री”हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर अनेक भावना उभ्या राहतात — माया, प्रेम, संवेदनशीलता, जिव्हाळा,

नात्यांचे नवीन प्रकार : कारणे आणि परिणाम

मीनाक्षी जगदाळे आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात मानवी नातेसंबंधांची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी लग्न