CBSE दहावीच्या बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार

नवी दिल्ली : सीबीएसई दहावीच्या बोर्डाची परीक्षा २०२६ पासून आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली आहे.ही शिफारस नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली आहे.


या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याचे गुण पहिल्या टप्प्यात कमी असतील तर तो दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करून सुधारणा करू शकेल. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले, "पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा मेमध्ये होईल.


दोन्ही टप्प्यांचे निकाल अनुक्रमे एप्रिल आणि जूनमध्ये जाहीर केले जातील. विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य असेल. तर दुसरा टप्पा पर्यायी असेल. विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये त्यांची कामगिरी सुधारण्याची परवानगी असेल." मंजूर केलेल्या निकषांनुसार हिवाळी सत्रात सहभागी होणाऱ्या शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना को1णत्याही टप्प्यावर बोर्डाच्या परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. शैक्षणिक सत्रादरम्यान अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च