पालखी सोहळ्यादरम्यान वाल्हेनगरीत वैष्णवांचा लोटला अलोट महासागर

पालखी खांद्यावर घेत ग्रामस्थांकडून विसाव्याला प्रदक्षिणा


पुणे : नाम गाऊ नाम घेऊ।।
नाम विठोबाला वाऊ।।
आमि दहिवाचे दहिवाचे दास पंढरीरायाचे।।


ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का, गंध लावून खांद्यावर भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांनी टाळ-मृदंगांच्या गजरात आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या वाल्हेनगरीत (ता. पुरंदर) माउलींचा पालखी सोहळा विसावला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आद्य रामायणकारांच्या वाल्हेनगरीत बुधवारी (दि. २५ ) वैष्णवांचा अलोट महासागर लोटला होता.


अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन पहाटे सहाच्या सुमारास टाळ-मृदंगांचा गजर व हरिनामाच्या जयघोषामध्ये पालखी सोहळा वाल्हेनगरीकडे मार्गस्थ झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास दौंडज ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी ११.४० वाजेच्या सुमारास पालखीचा नगारखाना व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हेनगरीच्या वेशीवर दाखल झाला. या वेळी वाल्हेचे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि तरुणांनी पुष्पवृष्टी करीत ‘माउली माउली’चा जयघोष करीत जोरदार स्वागत केले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, तहसीलदार विक्रम रजपूत आदींसह पुरंदर तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारीवर्ग उपस्थित होते.


आज पालखीचा लोणंदला मुक्काम
स्वागतानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजनामुळे एक तासाच्या आत सुकलवाडी फाट्याजवळील पालखीतळावर हा सोहळा पोहोचला. रथामधून पालखी काढून ग्रामस्थांच्या खांद्यावर देण्यात आली. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवत पालखी विसाव्याला प्रदक्षिणा घातली. आरतीनंतर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माउलींचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवारी (दि. २६) सकाळी साडे सहा वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ होणार असून, संध्याकाळी लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.


पुढील वर्षी तरी व्हावी ‘वाल्हे’ची ग्रामप्रदक्षिणा
वाल्हे गावची श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची परंपरा असलेली ग्रामप्रदक्षिणा आळंदी देवस्थानकडून मागील काही वर्षांपासून पालखीतळावर पोहचण्यास उशीर होत असल्याचे तसेच दुपारच्या जेवणाचे कारण देत बंद करण्यात आली आहे. यावर्षी पालखी सोहळा लवकरच महर्षी वाल्मीकी विद्यालयाजवळ सकाळी ११.४० वाजताच पोहचला होता. यावर्षीही ग्रामप्रदक्षिणा झाली नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत होता. पुढील वर्षी पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल व या वर्षापेक्षाही पुढील वर्षी पालखी सोहळा लवकर वाल्हे गावच्या वेशीवर पोहचेल, असा अंदाज वर्तवीत वाल्हे गावची ग्रामप्रदक्षिणा सुरू होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

Comments
Add Comment

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी