रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी करतात काय?

  55

महाड येथील आंबेत-टोळ पुलांचे भवितव्य धोक्यात, लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष

महाड : रायगड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या प्रयत्नाने रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हयांना जोडणारे बांधलेले आंबेत व टोळ पुल आज गंभीर संकटात सापडले आहेत. ४७ वर्षे जुने झालेले हे पुल पूर्णपणे कालबाह्य झालेले असूनही नवीन बांधकामाऐवजी केवळ तात्पुरत्या दुरुस्तीवर करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे.

सावित्री पूल दुर्घटनेचा धडा विसरला?

२०१६ मध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळून ३५ जणांनी जीव गमावला होता. या दुर्घटनेनंतर राज्यभरातील धोकादायक पुलांचे अंडरवॉटर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ९ वर्षांनंतरही या सर्वेक्षणाच्या अहवालाचे काय झाले हे गुलदस्त्यातच आहे.

आंबेत पुलाची धोकादायक स्थिती

२०१९ मध्ये वाळू वाहतुकीच्या बार्जने आंबेत पुलाच्या खांबाला दिलेल्या धडकीमुळे पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक झाली होती. दोन वर्षांनी करोडो रुपयांच्या खर्चाने दोन वेळा केलेल्या दुरुस्तीनंतर २०२१ मध्ये हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.

निधी मंजुरीचा गोंधळ

टोळ व दादली पुलालाही ४० वर्षाहून अधिक कार्यकाळ झाला आहे. केवळ दादली पुलाच्या नव्या कामाला मान्यता मिळाली असली तरी आंबेत व टोळ पुलांसाठी निधी मंजूर झालेला नाही. करोडो रुपयांचा हा खर्च राज्य सरकार करणार की केंद्र सरकार, हा प्रश्न कायम आहे.

लोकप्रतिनिधींची उदासीनता

रत्नागिरी व रायगड या दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या मुद्द्यावर उदासीन असल्याचे दिसून येत आहे. नवीन पूल बांधकामाला किमान तीन वर्षे लागण्याची शक्यता असताना मंजुरीला किती काळ लागेल हा देखील अनुत्तरित प्रश्न आहे.

नागरिकांना 'तारेवरची कसरत'

लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतरच राज्य सरकार निधी देते की केंद्राकडे बोट दाखवते, या गोंधळामुळे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे.

कोकणातील या महत्त्वाच्या पुलांच्या भविष्याबाबत तत्काळ निर्णय घेणे गरजेचे असून लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील

Kangana Ranaut : "बाप रे, एकाच खोलीत पाचवेळा… कंगनाचा थरारक खुलासा ऐकून अंगावर शहारे येतील!" नेमकं काय घडलं त्यावेळी?

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि

Lay off: तीन दिवसात तीन कंपन्यांची कर्मचारी कपातीची घोषणा लवकरच 'या' कंपनीतही १२००० जणांच्या नोकऱ्या जाणार !

मोहित सोमण:आयटीतील एक चिंताजनक बातमी म्हणजे तीन दिवसात तीन कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. पहिले

सिनेमाचा निर्मिती खर्च ४०० कोटी, पहिल्या दिवशीची कमाई ५० कोटी, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यावर पडलं पाणी

मुंबई : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत याचा कुली सिनेमा १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा एकूण

Pakistan Cloudburst : पाकिस्तानमध्ये प्रलय! ढगफुटी आणि पुरानं ४१ बळी, ५०० पर्यटक बेपत्ता

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा जणांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त मुजफ्फराबाद : पाकिस्तानातील अनेक भागांवर मुसळधार

Gold Silver: स्वातंत्र्यदिनी सोने स्वस्त व चांदी महाग 'हे' आहे सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण: जागतिक सोन्यात आज घसरण झाल्याने भारतातल्या सराफा बाजारातही सोन्याची किंमत घसरली आहे. काल सोन्याच्या