लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?


मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन होण्यास यंदा उशीर होत आहे. लालबागचा राजा समुद्रात नेण्यात आला. पण मूर्ती तराफ्यावर ठेवताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन रखडले. सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. पण दोन तास गणपती किनाऱ्यावरच होता.


लालबागच्या राजाची मिरवणूक वाजतगाजत आणि गुलाल उधळत गिरगाव चौपाटीवर पोहोचली. चौपाटीवर गणपतीच्या विसर्जनाची तयारी झाली. यानंतर लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर शेवटची आरती झाली. नंतर लालबागचा राजा समुद्रात नेण्यात आला. पण मूर्ती तराफ्यावर ठेवताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन रखडले.


विसर्जनासाठी सजवलेला तराफा आणि मूर्ती ठेवलेला पाट यांच्यात समन्वय राखण्यात अडचणी निर्माण झाल्या. यामुळे विसर्जन रखडले. आता दुपारी किंवा संध्याकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.


परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोळी बांधवांची मदत घेतली जात आहे. भरतीनंतर ओहोटी येईल. ओहोटी येईपर्यंत थांबावे असा सल्ला कोळी बांधवांनी मंडळाला दिला आहे. समुद्राचे पाणी ओसरल्यानंतरच विसर्जन होऊ शकेल, असे चित्र आहे.


Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र