S&P Global Report : भारताच्या जीडीपीत पुढील दोन वर्षांत वाढ होणार असल्याचे कंपनीचे भाकीत! 'या' कारणांमुळे ही वाढ अपेक्षित

  29

प्रतिनिधी: एस अँड पी ग्लोबल (S& P Global)रेटिंग एजन्सीने भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) बाबत नवे भाकीत मांडले आहे.कंपनीने केलेल्या पुनः सर्वेक्षणानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.प्रामुख्याने घरगुती मागणीत उल्लेखनीय वाढ झाल्याने ही वाढ अपेक्षित असल्याचे एस अँड पी ग्लोबलने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.रिसर्च निरिक्षणात म्हटल्याप्रमाणे,कंपनी भारतीय अर्थ व्यवस्थेकडे बघताना,भारताचा यावर्षी जीडीपी ६.५% राहू शकतो असे म्हटले आहे.याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी जीडीपीत ०.२% वाढ होऊ शकते असेही त्यामध्ये म्हटले आहे.तसेच इयर ऑन इयर बेसिसवर (YoY)मध्ये ही वाढ आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ०.२% आणखी वाढून ६.७% राहू शकते असेही अहवालात म्हटले गेले.

याखेरीज अहवालात म्हटले आहे की,' भारतातील अन्नधान्यातील महागाईत घट होत असल्याने हेडलाईन्स इन्फ्लेशन (महागाई)पातळी राखणे शक्य झाले आहे.सामान्यतः या अहवालात भारतासोबतच दक्षिण आशियाई देशाचे भाकीत मांडले जाते ज्यामध्ये इंडोनेशिया मलेशिया देशांचाही समावेश आहे.मात्र अमेरिकेबरोबर घटत्या निर्यातीमुळे मात्र वस्तूंच्या किमती वाढू शकतात असाही इशारा अंदाजपत्रकात मांडला गेला आहे.निरिक्षणातील माहितीनुसार,यंदा मान्सून सामान्य पा तळीवर राहू शकतो व तेलाच्या किमतीत घसरण अपेक्षित असून आर्थिक बाबतीत सहज सरलता अपेक्षित आहे. आगामी काळात आयकरातही दिलासा मिळू शकतो अशी संभावनाही अहवालात व्यक्त केली गेली.

संपूर्ण आशिया पॅसिफिक खंडाचा विचार करता मागणीतही घट अपेक्षित आहे व ती मागणीही कमी लवचिक (Resilient)असू शकते असा निवाळा या अभ्यासात दिला गेला आहे.चीनच्या बाबतीत मात्र एस अँड पी ग्लोबलने काहीसा वेगळा अंदाज वर्तवला आहे.चीनच्या बाबतीत,आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीडीपी दर ४.३% व २०२६-२७ मध्ये हाच दर ४.०% राहू शकतो असे म्हटले आहे.

त्यात असेही म्हटले आहे की,भारत आणि फिलीपिन्ससारख्या वस्तूंच्या निर्यातीशी कमी संपर्क असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक मंदी मर्यादित करण्यासाठी देशांतर्गत मागणीची लवचिकता विशेषतः संबंधित आहे.याशिवाय जागतिक ऊर्जे च्या किमतींमध्ये अलीकडेच झालेली घसरण आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चलनातील वाढ यामुळे पुढील महिन्यांत किमतीतील वाढ कमी होईल, तसेच मध्य पूर्वेतील अशांततेमुळे तेलाच्या किमतीत अलीकडेच वाढ झाली असेही अहवा लात नमूद केले गेले आहे.
Comments
Add Comment

Ashadhi Wari 2025 : भोळ्याभाबड्या वारकऱ्यांची फसवणूक! आषाढी वारीत विठ्ठल दर्शनाचे बनावट पास विक्रीचा प्रकार उघड

पालखी सोहळ्यातील ७ वारकऱ्यांची फसवणूक पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने

Pune Suicide Case : भयंकर घटना! कोकण कड्यावर तलाठी अन् अल्पवयीन मुलीचा मृतदेह; १२०० फूट खोल दरीत…

जुन्नर : कधी कोणाला कसा मृत्यू येईल आणि त्याचे परिणाम काय असतील हे सांगता येत नाही. अशातच पुण्यातून एक धक्कादायक

भारतीय कसोटी क्रिकेट संघाने पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला का बांधली काळी पट्टी ?

लीड्स : लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू

Actor Srikanth Arrest : दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक!

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी

मंत्री नितेश राणे भारतात ५ व्या क्रमांकावर ट्रेंड!

द्विटरवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव मुंबई : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश नारायण

Paytm UPI: पेटीएमने यूपीआय संलग्न बँक खात्यांसाठी एकूण शिल्लक तपासण्याची सुविधा सुरू केली

मुंबई: पेटीएमने आता अशा वापरकर्त्यांना ज्यांनी अनेक बँक खाती यूपीआयसाठी संलग्न केली आहेत, एकत्रितपणे सर्व