S&P Global Report : भारताच्या जीडीपीत पुढील दोन वर्षांत वाढ होणार असल्याचे कंपनीचे भाकीत! 'या' कारणांमुळे ही वाढ अपेक्षित

  42

प्रतिनिधी: एस अँड पी ग्लोबल (S& P Global)रेटिंग एजन्सीने भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) बाबत नवे भाकीत मांडले आहे.कंपनीने केलेल्या पुनः सर्वेक्षणानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.प्रामुख्याने घरगुती मागणीत उल्लेखनीय वाढ झाल्याने ही वाढ अपेक्षित असल्याचे एस अँड पी ग्लोबलने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.रिसर्च निरिक्षणात म्हटल्याप्रमाणे,कंपनी भारतीय अर्थ व्यवस्थेकडे बघताना,भारताचा यावर्षी जीडीपी ६.५% राहू शकतो असे म्हटले आहे.याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी जीडीपीत ०.२% वाढ होऊ शकते असेही त्यामध्ये म्हटले आहे.तसेच इयर ऑन इयर बेसिसवर (YoY)मध्ये ही वाढ आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ०.२% आणखी वाढून ६.७% राहू शकते असेही अहवालात म्हटले गेले.

याखेरीज अहवालात म्हटले आहे की,' भारतातील अन्नधान्यातील महागाईत घट होत असल्याने हेडलाईन्स इन्फ्लेशन (महागाई)पातळी राखणे शक्य झाले आहे.सामान्यतः या अहवालात भारतासोबतच दक्षिण आशियाई देशाचे भाकीत मांडले जाते ज्यामध्ये इंडोनेशिया मलेशिया देशांचाही समावेश आहे.मात्र अमेरिकेबरोबर घटत्या निर्यातीमुळे मात्र वस्तूंच्या किमती वाढू शकतात असाही इशारा अंदाजपत्रकात मांडला गेला आहे.निरिक्षणातील माहितीनुसार,यंदा मान्सून सामान्य पा तळीवर राहू शकतो व तेलाच्या किमतीत घसरण अपेक्षित असून आर्थिक बाबतीत सहज सरलता अपेक्षित आहे. आगामी काळात आयकरातही दिलासा मिळू शकतो अशी संभावनाही अहवालात व्यक्त केली गेली.

संपूर्ण आशिया पॅसिफिक खंडाचा विचार करता मागणीतही घट अपेक्षित आहे व ती मागणीही कमी लवचिक (Resilient)असू शकते असा निवाळा या अभ्यासात दिला गेला आहे.चीनच्या बाबतीत मात्र एस अँड पी ग्लोबलने काहीसा वेगळा अंदाज वर्तवला आहे.चीनच्या बाबतीत,आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीडीपी दर ४.३% व २०२६-२७ मध्ये हाच दर ४.०% राहू शकतो असे म्हटले आहे.

त्यात असेही म्हटले आहे की,भारत आणि फिलीपिन्ससारख्या वस्तूंच्या निर्यातीशी कमी संपर्क असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक मंदी मर्यादित करण्यासाठी देशांतर्गत मागणीची लवचिकता विशेषतः संबंधित आहे.याशिवाय जागतिक ऊर्जे च्या किमतींमध्ये अलीकडेच झालेली घसरण आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चलनातील वाढ यामुळे पुढील महिन्यांत किमतीतील वाढ कमी होईल, तसेच मध्य पूर्वेतील अशांततेमुळे तेलाच्या किमतीत अलीकडेच वाढ झाली असेही अहवा लात नमूद केले गेले आहे.
Comments
Add Comment

Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल

आरबीआयकडून पुन्हा आश्चर्याचा धक्का रेपो दर ५.५०% कायम राहणार ! गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर !

मोहित सोमण: अखेर ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. आरबीआयचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी यावेळी रेपो

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

Stock Market: सकाळी शेअर बाजारात 'बल्ले बल्ले' सेन्सेक्स निफ्टी उसळला, MPC व्यतिरिक्त हे आजचे विश्लेषण!

मोहित सोमण: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात 'बल्ले बल्ले' वाढ झाली आहे. सकाळी बाजार सुरु

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात

RBI: थोड्याच वेळात बहुप्रतिक्षित आरबीआय पतधोरण समितीचा निकाल 'असा' असू शकतो

मोहित सोमण:आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा थोड्याच वेळात आपला वित्तीय पतधोरण समितीचा (MPC) निकाल जाहीर करतील. ४ ते