S&P Global Report : भारताच्या जीडीपीत पुढील दोन वर्षांत वाढ होणार असल्याचे कंपनीचे भाकीत! 'या' कारणांमुळे ही वाढ अपेक्षित

प्रतिनिधी: एस अँड पी ग्लोबल (S& P Global)रेटिंग एजन्सीने भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) बाबत नवे भाकीत मांडले आहे.कंपनीने केलेल्या पुनः सर्वेक्षणानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.प्रामुख्याने घरगुती मागणीत उल्लेखनीय वाढ झाल्याने ही वाढ अपेक्षित असल्याचे एस अँड पी ग्लोबलने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.रिसर्च निरिक्षणात म्हटल्याप्रमाणे,कंपनी भारतीय अर्थ व्यवस्थेकडे बघताना,भारताचा यावर्षी जीडीपी ६.५% राहू शकतो असे म्हटले आहे.याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी जीडीपीत ०.२% वाढ होऊ शकते असेही त्यामध्ये म्हटले आहे.तसेच इयर ऑन इयर बेसिसवर (YoY)मध्ये ही वाढ आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ०.२% आणखी वाढून ६.७% राहू शकते असेही अहवालात म्हटले गेले.

याखेरीज अहवालात म्हटले आहे की,' भारतातील अन्नधान्यातील महागाईत घट होत असल्याने हेडलाईन्स इन्फ्लेशन (महागाई)पातळी राखणे शक्य झाले आहे.सामान्यतः या अहवालात भारतासोबतच दक्षिण आशियाई देशाचे भाकीत मांडले जाते ज्यामध्ये इंडोनेशिया मलेशिया देशांचाही समावेश आहे.मात्र अमेरिकेबरोबर घटत्या निर्यातीमुळे मात्र वस्तूंच्या किमती वाढू शकतात असाही इशारा अंदाजपत्रकात मांडला गेला आहे.निरिक्षणातील माहितीनुसार,यंदा मान्सून सामान्य पा तळीवर राहू शकतो व तेलाच्या किमतीत घसरण अपेक्षित असून आर्थिक बाबतीत सहज सरलता अपेक्षित आहे. आगामी काळात आयकरातही दिलासा मिळू शकतो अशी संभावनाही अहवालात व्यक्त केली गेली.

संपूर्ण आशिया पॅसिफिक खंडाचा विचार करता मागणीतही घट अपेक्षित आहे व ती मागणीही कमी लवचिक (Resilient)असू शकते असा निवाळा या अभ्यासात दिला गेला आहे.चीनच्या बाबतीत मात्र एस अँड पी ग्लोबलने काहीसा वेगळा अंदाज वर्तवला आहे.चीनच्या बाबतीत,आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीडीपी दर ४.३% व २०२६-२७ मध्ये हाच दर ४.०% राहू शकतो असे म्हटले आहे.

त्यात असेही म्हटले आहे की,भारत आणि फिलीपिन्ससारख्या वस्तूंच्या निर्यातीशी कमी संपर्क असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक मंदी मर्यादित करण्यासाठी देशांतर्गत मागणीची लवचिकता विशेषतः संबंधित आहे.याशिवाय जागतिक ऊर्जे च्या किमतींमध्ये अलीकडेच झालेली घसरण आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चलनातील वाढ यामुळे पुढील महिन्यांत किमतीतील वाढ कमी होईल, तसेच मध्य पूर्वेतील अशांततेमुळे तेलाच्या किमतीत अलीकडेच वाढ झाली असेही अहवा लात नमूद केले गेले आहे.
Comments
Add Comment

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग, मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प

पंतप्रधानांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धापूर्वक पाऊल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची

रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Rohit Shetty Mumbai house : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना

अर्थसंकल्पातील 'विकसित भारत ' हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर मुंबई : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने

भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल

विकासाभिमुख आणि व्यवहार्य अर्थसंकल्प मुंबईच्या उद्योग व विकासवाढीला चालना देणारा अर्थसंकल्प भाजपचे मुंबई

Budget 2026: हा युवा शक्तीचा बजेट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२६ जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र

सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ वापरणाऱ्यांना फटका बसणार, काय आहे नवीन करप्रणाली?, जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई: सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला वापरणाऱ्यांना आजपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र