मंत्री नितेश राणे भारतात ५ व्या क्रमांकावर ट्रेंड!

द्विटरवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव


मुंबई : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त द्विटरवर सुरू झालेला #HBDNiteshRane हा द्विटर हॅशटॅग देशभरात टॉप ५ मध्ये ट्रेंड झाला. तर #NiteshRaneJi हा हॅशटॅग दहाव्या क्रमांकावर होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या ट्रेंडमध्ये सहभागी होऊन मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या.



सोशल मीडियावर मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा आहे. मंत्री नितेश नारायण राणे यांचा वाढदिवस २३ जून २०२५ रोजी पार पडला. तत्पूर्वी मंत्री राणे यांनी २२ जून रोजी, जुहू येथील त्यांच्या 'अधिश' निवासस्थानी मुंबईसह राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या, तर २३ जूनला कणकवली येथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.



यावेळी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांना सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्या.


वाढदिवसाच्या निमित्ताने द्विटरवर #HBDNiteshRane या हॅशटॅगचा ट्रेंड सुरू होऊन काही तासांतच हा हॅशटॅग देशभरात टॉप ५ क्रमांकावर आला. हा ट्रेंड म्हणजे मंत्री नितेश राणे यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे.


?si=Dv1V6LoRdOA-TLm0
Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम