इस्रायलमधून मायदेशी परतले ५९४ भारतीय

नवी दिल्ली : इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी इस्रायलमधून ५४९ भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाची तीन विमाने नवी दिल्लीत पोहोचली. पहिल्या विमानात १६१, दुसऱ्या विमानात १६५ आणि तिसऱ्या विमानात २६८ भारतीय नागरिकांना आणण्यात आले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री (एमओएस) पवित्रा मार्गेरिटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले. परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले की ऑपरेशन सिंधूचा इस्रायल टप्पा २३ जून २०२५ रोजी सुरू झाला. यामध्ये १६१ भारतीय नागरिकांची पहिली तुकडी जॉर्डनमधून मायदेशी परत आणण्यात आली. त्यानंतर, हवाई दलाच्या सी-१७ विमानाने इस्रायलमधून १६५ प्रवाशांना परत आणले. मंगळवारी दुपारी २६८ नागरिकांना घेऊन तिसरे विमान भारतात पोहोचले. मशहादहून नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या एका विशेष विमानाने २९२ भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत इराणमधून २२९५ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे
Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.