इस्रायलमधून मायदेशी परतले ५९४ भारतीय

  53

नवी दिल्ली : इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी इस्रायलमधून ५४९ भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाची तीन विमाने नवी दिल्लीत पोहोचली. पहिल्या विमानात १६१, दुसऱ्या विमानात १६५ आणि तिसऱ्या विमानात २६८ भारतीय नागरिकांना आणण्यात आले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री (एमओएस) पवित्रा मार्गेरिटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले. परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले की ऑपरेशन सिंधूचा इस्रायल टप्पा २३ जून २०२५ रोजी सुरू झाला. यामध्ये १६१ भारतीय नागरिकांची पहिली तुकडी जॉर्डनमधून मायदेशी परत आणण्यात आली. त्यानंतर, हवाई दलाच्या सी-१७ विमानाने इस्रायलमधून १६५ प्रवाशांना परत आणले. मंगळवारी दुपारी २६८ नागरिकांना घेऊन तिसरे विमान भारतात पोहोचले. मशहादहून नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या एका विशेष विमानाने २९२ भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत इराणमधून २२९५ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे
Comments
Add Comment

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी

भारत-पाकिस्तानची हवाई क्षेत्रं २४ सप्टेंबरपर्यंत एकमेकांसाठी बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी