इस्रायलमधून मायदेशी परतले ५९४ भारतीय

  31

नवी दिल्ली : इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी इस्रायलमधून ५४९ भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाची तीन विमाने नवी दिल्लीत पोहोचली. पहिल्या विमानात १६१, दुसऱ्या विमानात १६५ आणि तिसऱ्या विमानात २६८ भारतीय नागरिकांना आणण्यात आले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री (एमओएस) पवित्रा मार्गेरिटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले. परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले की ऑपरेशन सिंधूचा इस्रायल टप्पा २३ जून २०२५ रोजी सुरू झाला. यामध्ये १६१ भारतीय नागरिकांची पहिली तुकडी जॉर्डनमधून मायदेशी परत आणण्यात आली. त्यानंतर, हवाई दलाच्या सी-१७ विमानाने इस्रायलमधून १६५ प्रवाशांना परत आणले. मंगळवारी दुपारी २६८ नागरिकांना घेऊन तिसरे विमान भारतात पोहोचले. मशहादहून नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या एका विशेष विमानाने २९२ भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत इराणमधून २२९५ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे
Comments
Add Comment

अ‍ॅक्सिओम ४ आज अंतराळात झेपावणार

तांत्रिक कारणामुळे यापूर्वी ६ वेळा मोहीम ढकलली होती पुढे नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अ‍ॅक्सिओम ४ मिशन आता २५ जून

जुलै २०२५ पासून रेल्वे प्रवास महागणार ?

नवी दिल्ली  : भारतीय रेल्वेने अनेक वर्षांनंतर रेल्वे तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे

काय सांगता ? २३ वर्षांची जान्हवी डांगेती करणार अंतराळ प्रवास

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमधील जान्हवी डांगेती ही २३ वर्षांची तरुणी टायटन्स स्पेसच्या अ‍ॅस्ट्रॉनॉट कँडिडेट

Israel-Iran conflict: एअर इंडियाने मध्यपूर्व, युरोप व अमेरिकेतील उड्डाणे तात्काळ बंद केली

सुरक्षा कारणांमुळे विमाने वळवली, प्रवाशांना असुविधा नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे एअर इंडियाने

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना ५ दिवसांची एनआयए कोठडी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच

जम्मूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंग न करताच दिल्लीला परतले, कारण...

नवी दिल्ली: श्रीनगरला जम्मूमार्गे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान आयएक्स-२५६४ सोमवारी दिल्लीला माघारी