RBI Digital Fraud: Digital Frauds रोखण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय! आता बँक DPIP विकसित करणार

प्रतिनिधी: वाढत्या सायबर घोटाळे,डिजिटल पेमेंट घोटाळे (Digital Fraud) यांना आळा घालण्यासाठी आरबीआयने (Reserve Bank of India) मोठे पाऊल उचलले आहे. या हल्ल्यापासून व्यवहार सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी बँकेने आता डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (Digital Payment Intelligence Platform DPIP) विकसित करण्यासाठी ठरवले आहे. आरबीआयच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा काम करणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अथवा घरगुती व्यवहारावर सततचा धोका रेंगाळत असल्याने या समस्येवर घाला घालण्यासाठी आरबीआयचा हा उपक्रम असणार आहे.प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी व पब्लिक सेक्टर या दोन्ही क्षेत्रांच्या संयोगातून हे व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. सध्या मोठ्या वेगात वाढलेल्या डिजिटल घोटाळ्यांचे नियत्रंण करण्यासाठी तसेच संशयास्पद व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी या व्यासपीठाचा आरबीआयला उपयोग होऊ शकतो. किंबहुना यातून गुंतवणूकदारांना अथवा नागरिकांना आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला या संदर्भातील उच्च दर्जात्मक बैठकीला आरबीआयचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे व्यासपीठ काही महिन्यांतच सुरू व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे आरबीआयच्या सुत्रांनी सांगितले आहे.या व्यासपीठामु ळे सायबर सुरक्षा चांगल्या दर्जाची मिळू शकते. कुठल्या विषयावर डेटाचे संरक्षण, माहिती चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच इतर व्यवहारावर बारकाईने लक्ष हे व्यासपीठ ठेऊ शकणार आहे.

माहितीप्रमाणे, ५ ते १० बँका या उपक्रमासाठी एकत्र येणार असून एकत्र पद्धतीने प्रोटो टाईप (Prototype) विकसित करणार आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान‌‌‌ छोट्या मोठ्या सगळ्या संशयी व्यवहारावर लक्ष ठेवून असू शकतात. आरबीआयने मागील वर्षीच शक्तीकांता दास गव्हर्नर असताना एनपीसीआय (National Payment Corporation of India NPCI) माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ए पी होटा यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी समिती नेमली होती त्याला आता बँकेकडून मोहोर लागली आहे.इंटरनेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट युजर इंटरफेस अशा विविध सोयींचा देखरेखीसाठी हे नवे व्यासपीठ काम करणार आहे असे बँकेने यावेळी स्पष्ट केले होते.
Comments
Add Comment

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या