RBI Digital Fraud: Digital Frauds रोखण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय! आता बँक DPIP विकसित करणार

  41

प्रतिनिधी: वाढत्या सायबर घोटाळे,डिजिटल पेमेंट घोटाळे (Digital Fraud) यांना आळा घालण्यासाठी आरबीआयने (Reserve Bank of India) मोठे पाऊल उचलले आहे. या हल्ल्यापासून व्यवहार सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी बँकेने आता डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (Digital Payment Intelligence Platform DPIP) विकसित करण्यासाठी ठरवले आहे. आरबीआयच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा काम करणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अथवा घरगुती व्यवहारावर सततचा धोका रेंगाळत असल्याने या समस्येवर घाला घालण्यासाठी आरबीआयचा हा उपक्रम असणार आहे.प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी व पब्लिक सेक्टर या दोन्ही क्षेत्रांच्या संयोगातून हे व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. सध्या मोठ्या वेगात वाढलेल्या डिजिटल घोटाळ्यांचे नियत्रंण करण्यासाठी तसेच संशयास्पद व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी या व्यासपीठाचा आरबीआयला उपयोग होऊ शकतो. किंबहुना यातून गुंतवणूकदारांना अथवा नागरिकांना आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला या संदर्भातील उच्च दर्जात्मक बैठकीला आरबीआयचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे व्यासपीठ काही महिन्यांतच सुरू व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे आरबीआयच्या सुत्रांनी सांगितले आहे.या व्यासपीठामु ळे सायबर सुरक्षा चांगल्या दर्जाची मिळू शकते. कुठल्या विषयावर डेटाचे संरक्षण, माहिती चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच इतर व्यवहारावर बारकाईने लक्ष हे व्यासपीठ ठेऊ शकणार आहे.

माहितीप्रमाणे, ५ ते १० बँका या उपक्रमासाठी एकत्र येणार असून एकत्र पद्धतीने प्रोटो टाईप (Prototype) विकसित करणार आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान‌‌‌ छोट्या मोठ्या सगळ्या संशयी व्यवहारावर लक्ष ठेवून असू शकतात. आरबीआयने मागील वर्षीच शक्तीकांता दास गव्हर्नर असताना एनपीसीआय (National Payment Corporation of India NPCI) माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ए पी होटा यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी समिती नेमली होती त्याला आता बँकेकडून मोहोर लागली आहे.इंटरनेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट युजर इंटरफेस अशा विविध सोयींचा देखरेखीसाठी हे नवे व्यासपीठ काम करणार आहे असे बँकेने यावेळी स्पष्ट केले होते.
Comments
Add Comment

कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा, लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचा सूचना

मुंबई : कोकण किनारपट्टीला २३ जून सायंकाळी ५.३० वाजल्यापासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८.३० वाजेपर्यंत

ENG vs IND : ११८ धावांची तुफानी खेळी करत ऋषभ पंत झाला बाद, भारताकडे तीनशे पार आघाडी

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना ५ दिवसांची एनआयए कोठडी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच

आषाढ वारीत डीजे, साउंड सिस्टिम टाळा

काटेवाडी : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढ पालखी सोहळ्यामध्ये टाळ, मृदंग, वीणा आणि अखंड

केदारनाथहून परतल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरची तब्येत बिघडली

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ यात्रेला

जम्मूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंग न करताच दिल्लीला परतले, कारण...

नवी दिल्ली: श्रीनगरला जम्मूमार्गे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान आयएक्स-२५६४ सोमवारी दिल्लीला माघारी