Maharashtra Rain: उद्या मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पुढील २४ तासात मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने आज सायंकाळी ५:३० पासून २५ जून रोजी रात्री ८:३० वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा दिला आहे, त्यामुळे या काळात लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.



पुढील २४ तासांत पुन्हा मुसळधार


गेल्या दोन दिवसांपासून थोडी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील २४ तासांत कोकण आणि घाट भागात काही ठिकाणी हलका-मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्याच्या आतल्या भागातही हलका-मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भासाठीही हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे.



विदर्भावर मान्सून होणार मेहरबान


विदर्भातील नागरिकांवर मान्सूनच्या ढगांची मेहरबानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या मंगळवारी २४ जूनपासून अकोला, नागपूरसह विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जूनपासून पुढील पाच दिवस, म्हणजे शनिवार २८ जूनपर्यंत विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत मात्र मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे भात, सोयाबीन, कापूस पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे.

Comments
Add Comment

Teacher Suicide Case : सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलांसोबत केलं भयकंर नंतर...

शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर Teacher Suicide Case :

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी