E Bike Taxi in Maharashtra : महाराष्ट्रात ई-बाइक टॅक्सी सेवेला नागरिकांचा विरोध!

मुंबई : मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नियम तयार केले आहेत. मात्र, राज्य परिवहन विभागाने ई-बाइक टॅक्सी सेवेसाठी तयार केलेल्या नियमावलीवर नागरिकांनी ८५ सूचना-हरकती नोंदवल्या आहेत. त्यात ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करू नका, अशी मागणी करण्यात आली आहे. या हरकती-सूचना सरकारकडे पाठवल्या आहेत.



या नियमावलींवर ५ जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या. हरकतींपैकी १० संघटना, ८० हून अधिक नागरिकांनी हरकती नोंदविल्या. त्यात ही सेवा सुरू न करण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील १२ राज्यांमध्ये सध्या ही सेवा सुरू आहे. मात्र, कर्नाटकमध्ये काही अडचणींमुळे ती तात्पुरती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्यांतील अनुभवाचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नियम तयार केले आहेत. मात्र यावर ई-बाइक टॅक्सी सेवेला नागरिकांचा विरोधी दिसून येत आहे.


दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही या सेवेला विरोध केला आहे. त्यांच्या मते, या सेवेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतील, तसेच रिक्षाचालकांच्या रोजगारावरही गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ई-बाइक टॅक्सी सेवेला राज्यात नागरिकांचा वाढता विरोध पाहता यावर सूचना आणि हरकतींवर काय निर्णय घेण्यात येणार, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये