E Bike Taxi in Maharashtra : महाराष्ट्रात ई-बाइक टॅक्सी सेवेला नागरिकांचा विरोध!

  29

मुंबई : मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नियम तयार केले आहेत. मात्र, राज्य परिवहन विभागाने ई-बाइक टॅक्सी सेवेसाठी तयार केलेल्या नियमावलीवर नागरिकांनी ८५ सूचना-हरकती नोंदवल्या आहेत. त्यात ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करू नका, अशी मागणी करण्यात आली आहे. या हरकती-सूचना सरकारकडे पाठवल्या आहेत.



या नियमावलींवर ५ जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या. हरकतींपैकी १० संघटना, ८० हून अधिक नागरिकांनी हरकती नोंदविल्या. त्यात ही सेवा सुरू न करण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील १२ राज्यांमध्ये सध्या ही सेवा सुरू आहे. मात्र, कर्नाटकमध्ये काही अडचणींमुळे ती तात्पुरती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्यांतील अनुभवाचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नियम तयार केले आहेत. मात्र यावर ई-बाइक टॅक्सी सेवेला नागरिकांचा विरोधी दिसून येत आहे.


दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही या सेवेला विरोध केला आहे. त्यांच्या मते, या सेवेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतील, तसेच रिक्षाचालकांच्या रोजगारावरही गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ई-बाइक टॅक्सी सेवेला राज्यात नागरिकांचा वाढता विरोध पाहता यावर सूचना आणि हरकतींवर काय निर्णय घेण्यात येणार, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

डिप्लोमा परीक्षेचा निकाल जाहीर, अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) तंत्रशिक्षण पदविका परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यामुळे

Maharashtra Rain: उद्या मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पुढील २४ तासात मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा

CM Slams Abu Azmi: वारीवरून अबू आझमींचं वादग्रस्त विधान; फडणवीस म्हणाले, 'फालतू वक्तव्यांना उत्तर द्यायचं नाही!'

अबू आझमीच्या वादग्रस्त विधानांवर मुख्यमंत्र्यांची कठोर प्रतिक्रिया नागपूर : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu

Abu Azami Wari Controversy: 'हिंदू सण रस्ता अडवतात, पण आम्ही गप्प राहतो', पंढरपूर यात्रेवर अबू आझमीचे वादग्रस्त विधान

सोलापूर: महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या पालखी सोहळा सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी पंढरपूर

'मम्मी, मी विष प्यायलो आहे, माझा मृतदेह घेऊन जा', पुण्यात १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

पुणे: पुण्यात एका १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक ऑडिओ आणि

चंद्रभागा नदीत बुडणाऱ्या ६ भाविकांना वाचवण्यात यश, प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन केलं

पंढरपूर: पंढरपुरातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चंद्रभागा नदीत स्नान करत असताना बुडणाऱ्या सहा भाविकांना