Mumbai Film City Fire : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग, अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातील फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागली आहे. सकाळी ६.३०च्या सुमारास फिल्म सिटीतील अनुपमा या मालिकेच्या सेटवर ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.





रविवारी अनुपमाच्या सेटवर शूटिंग बंद होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझल्यानंतर याबाबत अधिक तपास आरे पोलीस करतील.



३ महिन्यांपूर्वी फिल्मसिटीच्या शेजारील घरांमध्ये आग


३ महिन्यांपूर्वी फिल्मसिटीच्या शेजारी नागरमोडी पाड्यात आंबेवाडी परिसरात भीषण आग लागली होती. संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नागरमोडी पाड्यात असलेल्या आंबेवाडीचा झोपडपट्टीमध्ये ही मोठी आग लागली होती. आगीच्या माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. घरात सिलेंडर गॅसचे विस्फोट झाल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली होती. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाले नाही पण मोठ्या प्रमाणात घरं जळून खाक झाली होती.


Comments
Add Comment

Python Snake : अंधेरीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे पाळला होता अजगर! वनविभागाच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे अजगर पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता

Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर