मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका! गंभीर आरोप करत 'या' नेत्याने सोडली साथ

"मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते, माझ्यावर हसत राहिले" केले अनेक आरोप


नागपूर: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीत गुंतलेल्या उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) ना मराठवाड्यातून मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे महत्वाचे शिलेदार डॉ. संजय लाखे पाटील (Dr . Sanjay Lakhe Patil)  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आपला शब्द पाळला नाही, असा आक्षेप लाखे पाटील यांनी घेतला. लाखे पाटील जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. परंतु, शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याचे त्यांनी म्हटले आहे.


संजय पाटील यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा हात सोडून उबाठात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आले. संजय पाटील म्हणाले की, "मला विधानसभा निवडणुकीत सांगलीऐवजी जालना येथून तिकीट देऊ, असे अश्वासन देण्यात आले. परंतु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यानी त्यांच्या वैयक्तिक अजेंडामुळे तसे होऊ दिले नाही. जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले."


अंबादास दानवेंवर टीका करताना पाटील म्हणाले की, "मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते. अंबादास दानवे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत होते, तेव्हा मला दौऱ्यापासून दूर ठेवले. कुठलीही जबाबदारी दिली नाही. मुळात मला कामाची संधी दिली नाही. मला कसे दूर ठेवले जाईल, हेच पाहिले गेले. संघटनात्मक कामापासून मला सातत्याने वगळण्यात आले. त्यामुळेच यापुढे मी ठाकरे गटात काम न करण्याचे ठरवले आहे."



राजीनामा पत्रात लाखेने काय लिहिले?


आपल्या राजीनामा पत्रात लाखे पाटील यांनी म्हटले आहे की, अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावत जिंकणारी जालना आपल्याकडे येणार नाही हा तिकडील 'शिष्यत्व धर्म' निभावला. विजयी जागा पदरात पाडून न घेता पक्षाला आणि मला ठेंगा दाखवला... आपल्या डोळ्यासमोर. त्यानंतर आपण मला सचिव पदाची जबाबदारी दिली पण गेल्या 13/14 महिन्यात वेळोवेळी विनंती करूनही कसलीच संघटनात्मक जबाबदारी आपण सोपवली तर नाहीच पण जिल्हा, विभाग, राज्य संघटनेतून मला हळूहळू संपूर्णतः बेदखल करण्यात आले. आपल्या मुखपत्रामध्ये कुठल्याही कार्यक्रमाच्या बातम्यात उपस्थित असूनही इतर सचिवासह माझे नाव येणार नाही ही रचना प्रस्थापित व्यवस्थेने ठरवून केली. आणि वाचून जाणकार मला हसत राहिले.  बातमीत नाव नाही तर पक्षात स्थान नाही असे सांगत राहिले.


Comments
Add Comment

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयतानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधीवर हल्लाबोल

पाटणा : बिहार विधानसभेच्या निकालांत एनडीएला मोठं यश मिळाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

अजित पवारांवर आली नामुष्की, स्वप्न अपूर्णच राहिले

पाटणा : आधी राष्ट्रीय पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या नेतृत्वात भाजपचा प्रभाव वाढल्यामुळे

बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय, भाजप सर्वात मोठा पक्ष

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला. भारतीय जनता पार्टी (BJP) बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष

“२५ वर्षे मुंबई महापालिका लुटली” अमित साटमांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष वार

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला असून आता पक्षाने थेट

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर