मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका! गंभीर आरोप करत 'या' नेत्याने सोडली साथ

"मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते, माझ्यावर हसत राहिले" केले अनेक आरोप


नागपूर: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीत गुंतलेल्या उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) ना मराठवाड्यातून मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे महत्वाचे शिलेदार डॉ. संजय लाखे पाटील (Dr . Sanjay Lakhe Patil)  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आपला शब्द पाळला नाही, असा आक्षेप लाखे पाटील यांनी घेतला. लाखे पाटील जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. परंतु, शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याचे त्यांनी म्हटले आहे.


संजय पाटील यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा हात सोडून उबाठात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आले. संजय पाटील म्हणाले की, "मला विधानसभा निवडणुकीत सांगलीऐवजी जालना येथून तिकीट देऊ, असे अश्वासन देण्यात आले. परंतु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यानी त्यांच्या वैयक्तिक अजेंडामुळे तसे होऊ दिले नाही. जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले."


अंबादास दानवेंवर टीका करताना पाटील म्हणाले की, "मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते. अंबादास दानवे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत होते, तेव्हा मला दौऱ्यापासून दूर ठेवले. कुठलीही जबाबदारी दिली नाही. मुळात मला कामाची संधी दिली नाही. मला कसे दूर ठेवले जाईल, हेच पाहिले गेले. संघटनात्मक कामापासून मला सातत्याने वगळण्यात आले. त्यामुळेच यापुढे मी ठाकरे गटात काम न करण्याचे ठरवले आहे."



राजीनामा पत्रात लाखेने काय लिहिले?


आपल्या राजीनामा पत्रात लाखे पाटील यांनी म्हटले आहे की, अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावत जिंकणारी जालना आपल्याकडे येणार नाही हा तिकडील 'शिष्यत्व धर्म' निभावला. विजयी जागा पदरात पाडून न घेता पक्षाला आणि मला ठेंगा दाखवला... आपल्या डोळ्यासमोर. त्यानंतर आपण मला सचिव पदाची जबाबदारी दिली पण गेल्या 13/14 महिन्यात वेळोवेळी विनंती करूनही कसलीच संघटनात्मक जबाबदारी आपण सोपवली तर नाहीच पण जिल्हा, विभाग, राज्य संघटनेतून मला हळूहळू संपूर्णतः बेदखल करण्यात आले. आपल्या मुखपत्रामध्ये कुठल्याही कार्यक्रमाच्या बातम्यात उपस्थित असूनही इतर सचिवासह माझे नाव येणार नाही ही रचना प्रस्थापित व्यवस्थेने ठरवून केली. आणि वाचून जाणकार मला हसत राहिले.  बातमीत नाव नाही तर पक्षात स्थान नाही असे सांगत राहिले.


Comments
Add Comment

नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर, अंबरनाथमध्ये शिवसेनेला दिलासा; भाजपाला मोठा धक्का

अंबरनाथ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला राड्यांचे ग्रहण

मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ

महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर