मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात, राज्यात कुठे आणि किती पाऊस पडणार ?

मुंबई : राज्यात दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुढील काही दिवसांनी म्हणजेच दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस पडल्यामुळे काही भागात लोकांचं प्रचंड नुकसान झालंय. तरी ही विदर्भात अजूनही पाऊस पडला नसल्याने तेथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पुण्यात ऑरेंज अलर्ट तर मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.


पुण्यातील इतर भागात ही शनिवारी ढगाळ वातावरण होते, परंतू संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, पुणे जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पालघर, ठाणे,मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर इथं तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.


विदर्भातील अनेक जिल्हे कोरडे असल्याने विदर्भातील शेतकरी मात्र पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पाऊस न पडल्यामुळे अकोल्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. विदर्भातील अद्यापही तापमान कमी झालेलं नाही. पावसाअभावी धरणांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे.  नागपूरमध्ये तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या वर आहे. ज्या भागात पाऊस झाला तिकडे जवळपास 13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, उर्वरित शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महत्वाचे म्हणजे आता ज्यांनी पेरणी केली ते शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेत.






 

 
Comments
Add Comment

Banks Closed : मे महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

मुंबई : मे 2026 महिन्यात देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, विविध सण, राष्ट्रीय आणि

Mira-Bhayandar terror scare : आरोपी जुबैर ‘जिहाद’च्या नावाखाली हिंदूंवर हल्ला करू इच्छित होता- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, मीरा रोड येथे झालेला संशयित ‘लोन वुल्फ’

Mantralaya : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या

Devendra Fadanvis : शिवरायांच्या नावावर निरर्थक वाद उकरून काढणे संतापजनक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आक्षेप घेणाऱ्यांनी 'शिवाजी कोण होता?' पुस्तक वाचले का? मुंबई : "छत्रपती शिवाजी

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत नवा फॉर्म्युला

दंडात्मक कारवाईला तूर्तास ब्रेक; १ मेपासून राज्यव्यापी मोहीम, चालकांना सहा महिन्यांचा 'दिलासा' मुंबई : राज्यातील

Digital Registration : प्रकल्प बाधितांच्या पात्रतेची डिजिटल नोंदणी करा

- भाजप नगरसेविकेची अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक