आगामी वर्ल्डकप खेळणे विराट आणि रोहितसाठी सोपे नसेल: गांगुली

कोलकाता : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या दोघांचंही लक्ष्य हे २०२७ चा क्रिकेट विश्वचषकावर आहे. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना तंदुरुस्त राहणे आणि २०२७ मध्ये भारताच्या एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान मिळवणे सोपे नसेल असे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हटले आहे.


"आपल्या सर्वांना हे समजून घेतले पाहिजे की, सर्वांप्रमाणेच, खेळ त्यांच्यापासून दूर जाईल आणि ते खेळापासून दूर जातील," असे गांगुलीने त्याच्या निवासस्थानी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.


पुढील एकदिवसीय विश्वचषक हा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. आयसीसीची ही स्पर्धा खेळली जाईल तेव्हा कोहली ३८ वर्षांचा असेल आणि रोहित ४० वर्षांचा असेल. त्यामुळेच त्यांना भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण जाणार असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात आहे.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात