आगामी वर्ल्डकप खेळणे विराट आणि रोहितसाठी सोपे नसेल: गांगुली

कोलकाता : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या दोघांचंही लक्ष्य हे २०२७ चा क्रिकेट विश्वचषकावर आहे. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना तंदुरुस्त राहणे आणि २०२७ मध्ये भारताच्या एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान मिळवणे सोपे नसेल असे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हटले आहे.


"आपल्या सर्वांना हे समजून घेतले पाहिजे की, सर्वांप्रमाणेच, खेळ त्यांच्यापासून दूर जाईल आणि ते खेळापासून दूर जातील," असे गांगुलीने त्याच्या निवासस्थानी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.


पुढील एकदिवसीय विश्वचषक हा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. आयसीसीची ही स्पर्धा खेळली जाईल तेव्हा कोहली ३८ वर्षांचा असेल आणि रोहित ४० वर्षांचा असेल. त्यामुळेच त्यांना भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण जाणार असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात आहे.

Comments
Add Comment

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित