ऑपरेशन सिंधू : आतापर्यंत ८२७ भारतीय मायदेशी परतले

परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल यांनी दिली माहिती


नवी दिल्ली : इरणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात येतेय. यातंर्गत आतापर्यंत 827 भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. उर्वरित लोकांना देखील आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करत दिली.

ऑपरेशन सिंधू अंतर्गत पहिल्या टप्प्यात इराणमधून 110 भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे मायदेशी परतले. या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मायदेशी परत आणण्यात आले. त्यानंतर 20 जून रोजी 290 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले गेले. तर आज, शनिवारी 21 जून रोजी पहाटे 117 भारतीयांना घेऊन विशेष विमान डेरेदाखल झाले. तर दुपारी 4.30 वाजता इराणमधून 310 भारतीय नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत एक विमान दाखल झाले. यासह आतापर्यंत एकूण 827 भारतीयांना मायदेशी आणण्यात आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे