ऑपरेशन सिंधू : आतापर्यंत ८२७ भारतीय मायदेशी परतले

  87

परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल यांनी दिली माहिती


नवी दिल्ली : इरणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात येतेय. यातंर्गत आतापर्यंत 827 भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. उर्वरित लोकांना देखील आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करत दिली.

ऑपरेशन सिंधू अंतर्गत पहिल्या टप्प्यात इराणमधून 110 भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे मायदेशी परतले. या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मायदेशी परत आणण्यात आले. त्यानंतर 20 जून रोजी 290 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले गेले. तर आज, शनिवारी 21 जून रोजी पहाटे 117 भारतीयांना घेऊन विशेष विमान डेरेदाखल झाले. तर दुपारी 4.30 वाजता इराणमधून 310 भारतीय नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत एक विमान दाखल झाले. यासह आतापर्यंत एकूण 827 भारतीयांना मायदेशी आणण्यात आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे