ऑपरेशन सिंधू : आतापर्यंत ८२७ भारतीय मायदेशी परतले

  48

परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल यांनी दिली माहिती


नवी दिल्ली : इरणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात येतेय. यातंर्गत आतापर्यंत 827 भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. उर्वरित लोकांना देखील आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करत दिली.

ऑपरेशन सिंधू अंतर्गत पहिल्या टप्प्यात इराणमधून 110 भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे मायदेशी परतले. या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मायदेशी परत आणण्यात आले. त्यानंतर 20 जून रोजी 290 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले गेले. तर आज, शनिवारी 21 जून रोजी पहाटे 117 भारतीयांना घेऊन विशेष विमान डेरेदाखल झाले. तर दुपारी 4.30 वाजता इराणमधून 310 भारतीय नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत एक विमान दाखल झाले. यासह आतापर्यंत एकूण 827 भारतीयांना मायदेशी आणण्यात आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी दोघांना अटक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारुन २६

Raja Raghuvanshi Murder Case: सोनम आणि तिच्या प्रियकराला १३ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी

शिलाँग: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात (Raja Raghuvanshi Murder Case) शिलाँग न्यायालयाने शनिवारी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) आणि तिचा

इंडिगोने जाहीर केला मेडे आणि....

बंगळुरू : एअर इंडियाच्या AI 171 या विमानाच्या अपघाताला काही दिवस होत नाहीत तोच इंडिगो या बजेट एअरलाईन कंपनीच्या

रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा काम मिळणार, रेल्वे मंडळाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे . निवृत्त कर्मचाऱ्यांना रेल्वेमधील नॉन-राजपत्रित

अहमदाबाद विमान अपघात: DGCAचा एअर इंडियाला दणका! एअर इंडियाला 'टाळे' लागू शकते; ३ अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

नवी दिल्ली: अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या

निवडणुकीचे व्हीडिओसह फोटो ४५ दिवसांत नष्ट करा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यांना निर्देश नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेशी संबंधित