विमानात किंवा हॉस्टेलमध्ये नसूनही चित्रपट निर्मात्याचा विमान अपघातात मृत्यू

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI 171 विमान अपघाताशी संबंधित एक नवी बातमी आली आहे. विमानात किंवा हॉस्टेलमध्ये नसूनही चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांचा विमान अपघातामुळेच मृत्यू झाला. डीएनए चाचणीअंती अहमदाबाद पोलिसांनी ही माहिती दिली.

ज्या दिवशी विमान अपघात झाला त्या दिवसापासूनच ३४ वर्षीय चित्रपट निर्माते महेश जिरावाला बेपत्ता होते. पोलीस जिरावाला यांना शोधत होते. चित्रपट निर्माते महेश जिरावाला दुचाकीवरुन घरी जाण्यासाठी निघाले होते, असे पोलिसांना कळले. यामुळे जिरावाला कोणत्या मार्गाने घरी जात होते याचा तपास करण्यात आला. या मार्गात विमान अपघाताचे ठिकाण असल्याचे लक्षात आले. चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांना शेवटचे बघणाऱ्यांनी दिलेली माहिती तसेच जिरावालांचा घरी जाण्याचा मार्ग यामुळे विमान अपघातात जिरावाला यांचा मृत्यू झाल्याची शंका पोलिसांच्या मनात आली. अखेर शंका निरसनासाठी डीएन चाचणी करण्याचा निर्णय झाला.

जिरावाला कुटुंबातील सदस्यांचे डीएनए आणि मृतांपैकी एका व्यक्तीचा डीएनए जुळला. डीएनए जुळले आणि महेश जिरावाला यांच्या मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. या फूटेजमध्ये विमान अपघात झाला त्या वेळी जिरावाल त्याच भागातून दुचाकीवरुन जाताना दिसले. अखेर दुचाकीवरुन जाताना जिरावाला हॉस्टेलच्या इमारतीजवळ होते जेव्हा अपघात झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला. आगीत जळून खाक झालेली जिरावालांची दुचाकी पोलिसांनी शोधली. यानंतर नातलगांनी चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांचा मृतदेह स्वीकारला.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने