आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्याने एका व्यक्तीला चिरडले, व्हिडिओ आला समोर

गुंटूर: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या ताफ्यातील वाहनाने एका ५४ वर्षीय व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी येतुकुरुजवळ घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 


गुंटूर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ५४ वर्षीय व्यक्तीला चिरडले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे जनतेत संताप निर्माण झाला आहे. संबंधित घटनेची औपचारिक चौकशी सुरू झाली आहे.



मृत व्यक्ति वायएस आरसीपीचा समर्थक


सदर व्यक्तीचे नाव चिली सिंगय्या असे असून ते वेंगळयपालेम गावातील रहिवासी आणि वायएसआरसीपीचे समर्थक होते, जगन मोहन रेड्डी यांच्या सट्टेनापल्ली मंडळातील रेंटापल्ली गावाच्या भेटीदरम्यान ते  रस्त्याच्या कडेला उभे होते. रेड्डी तिथे एका पुतळ्याचे अनावरण करणार होते. सिंगय्या यांनी त्यावेळी रेड्डी यांना फुले वाहण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यादरम्यान त्यांची ताफ्याच्या वाहनासोबत टक्कर झाली. या टक्करमुळे ५४ वर्षीय सिंगय्या खाली पडले आणि वाहनाखाली आहे. ही भयानक घटना व्हिडिओ फुटेजमधून समोर आली आहे.   


 



 

व्हायरल व्हिडिओमध्ये सिंगय्या वाहनाखाली पडताना दिसत आहे, पण ताफा न थांबता पुढे जाताना दिसतो. गाडीची चाके अक्षरशः त्यांच्या मानेवरून जाताना या व्हिडिओमधून दिसून येते. या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले लोक ताबडतोब त्यांच्या मदतीला धावले आणि पोलिसांना याबद्दल माहिती देखील दिली. सिंगय्या यांना तातडीने गुंटूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.



पोलिस तपास आणि अधिकृत निवेदन


गुंटूरचे पोलिस अधीक्षक सतीश कुमार आणि गुंटूर रेंजचे आयजी सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. डेक्कन क्रॉनिकलशी बोलताना आयजी त्रिपाठी म्हणाले की "पीडिताचा अशा प्रकारे मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी आहे. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की ताफ्यात 30 ते 35 वाहने होती, तर फक्त तीन वाहनांना अधिकृत परवानगी होती." ते पुढे म्हणाले, "ताफ्यात सामील होणाऱ्या अनधिकृत वाहनांची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल."



कुटुंबाच्या मागण्या आणि सुरक्षेचे प्रश्न


सिंगय्याच्या कुटुंबाने या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेने राजकीय ताफ्याचे व्यवस्थापन आणि सुरक्षा नियमावलीमधील त्रुट्या उघडकीस आणल्या आहेत. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची अपेक्षा केल्या जात असून  करत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज सेवा तीर्थ, कर्तव्य भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन-१ आणि २'चे उद्घाटन करणार आहेत. नव्याने

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद