Ajit Doval: ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पहिल्यांदाच चीनला जाणार

नवी दिल्ली: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. डिसेंबरनंतरचा डोवाल यांचा हा दुसरा चीन दौरा असेल. या भेटीतील त्यांचे उद्दिष्ट दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेणे आणि भारत-चीन संबंधांमधील तणाव कमी करणे हे असणार आहे. ही भेट सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेच्या तयारीचा एक भाग आहे.


सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर आहे. यादरम्यान, अजित डोवाल यांची ही भेट अधिक महत्त्वाची मानली जात आहे. इराणचे एनएसए या बैठकीला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु डोवाल चीन, रशिया आणि इतर एससीओ सदस्य देशांच्या सुरक्षा सल्लागारांशी नक्कीच चर्चा करतील.

सर्वांच्या नजरा या गोष्टीकडे लागून आहेत की डोवाल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेणार का नाहीत. वांग यी हे चीनचे विशेष प्रतिनिधी देखील आहेत. ही भेट भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि चीनकडून पाकिस्तानला लष्करी पाठबळ दिल्या जात असलेल्या वातावरणात होणार आहे.

दहशतवादाबद्दल अजित डोवाल यांचे स्पष्ट मत


मीडिया रिपोर्टनुसार, अजित डोवाल यांचा हा चीन दौरा शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेच्या तयारीचा एक भाग आहे. ही शिखर परिषद सप्टेंबरच्या सुरुवातीला चीनमध्ये होणार आहे. डोवाल या दौऱ्यात चीन आणि रशियातील त्यांच्या समकक्षांशी भेट घेणार आहेत. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या दौऱ्यात अजित डोवाल दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याचा संदेश देतील. तसेच दहशतवाद्यांना मिळणाऱ्या मदतीला रोखण्याबाबतही ते चर्चा करण्याची शक्यता आहे.



भारत-चीन विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावर चर्चा  


याशिवाय या दौऱ्यात भारत आणि चीन दरम्यान थांबवण्यात आलेल्या थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनने भारताशी थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने चीनला कडक संदेश दिला होता. हा संदेश सीमापार दहशतवाद आणि पाकिस्तानच्या भूमिकेबाबत होता.


Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या