Sindhudurg Accident News: देवगडमध्ये एसटीचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू,

Sindhudurg Accident News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे गावात रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. तर मृत व्यक्तीमध्ये संकेत घाडी, संतोष गावकर, रोहन नाईक आणि सोनू कोळंबकर या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर


दरम्यान, या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांभुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे रिक्षातील प्रवाशांचे प्राण गमवावे लागले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूढील कारवाई सध्या केली जात आहे. मात्र या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी मध्य धुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतलं. तसंच पुढील तपासणी सुरू केली आहे.
Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

बंडगार्डनमध्ये भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : रविवारी पहाटे बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह

श्रीहरिकोटा : भारतीय नौदलाठी इस्रोने LVM3-M5/CMS-03 या रॉकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

बाजारात अजूनही दोन हजार रूपयांच्या नोटा, RBI ने दिली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा २०००च्या नोटा चर्चेचा विषय ठरत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नुकताच