RBI मोठी बातमी - २०२४ नंतर परकीय चलनसाठ्यात भारताचा नवा उच्चांक! 'इतके' अब्ज डॉलर्स तिजोरीत जमा

मुंबई: एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा परकीय चलन साठ्यात (Forex) १३ जूनपर्यंत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. जून १३ पर्यंतच्या आठवड्यात भारताला ६९८.९५० अब्ज डॉलर्सचा चल नसाठा मिळाला आहे. सप्टेंबर २०२४ नंतर वाढलेला हा सर्वांत मोठा चलन साठा आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२४ पर्यंत परकीय चलन साठा तब्बल ७०४.८९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.यापूर्वी नुकत्याच झालेल्या वित्तीय पतधोरण समितीचा नि काल जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कपात केली होती.५० बेसिस पूर्णांकाने ही कपात केल्याने रेपो दर (Repo Rate) ६ टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांवर आला होता.हे जाहीर करतानाच मल्होत्रा यांनी भा रताकडे ११ महिने सहज पुरेल इतका मुबलक परकीय चलनसाठा आहे‌ जो परदेशी देणी व आयातीचे पैसे सहज चुकते करू शकतो असे म्हटले होते.

आरबीआयच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सध्या भारताचा सोने चलनसाठा ८६.३१६ अब्ज डॉलर्स आहे. त्यापैकी Foreign Currency Assets FCA) हा हिस्सा ५८९.४२६ अब्ज डॉलर होता. जगभरात सोन्याच्या गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणा त वाढ होत आहे.अनेक राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँका (Central Apex Bank) सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ करत असताना भारतानेही हा पवित्रा घेतला होता. परकीय चलनसाठा आर्थिक वर्ष २०२३ मधील ५८ अब्ज डॉलरवरून वाढत आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ७८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

देशाची सर्वोच्च बँक आरबीआय व इतर देशांच्या सेंट्रल बँका आपल्या देशाचा चलनसाठा नियंत्रित करतात. भारताची दैनंदिन स्थितीत अर्थव्यवस्थेतील हालचाली, जमापुंजी, जमाखर्च पाहत त्याचा साठा नियंत्रित वेळोवेळी आरबीआय करत असते. देशाच्या अर्थव्यवस्थेतील तरलता (Liquidity),व रूपयांचे परकीय चलनाच्या देवाणघेवाणीतील मूल्य यावर बारकाईने लक्ष देत आरबीआय चलनाविषयी वेळोवेळी निर्णय घेत असते.
Comments
Add Comment

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील

Pratap Sarnaik : अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराला मिळाला आधार; सरनाईक कुटुंबाकडून शेतकऱ्यांना '१०१ गोवंश' भेट!

मुंबई : यावर्षी झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः धाराशिव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही