अमिताभ बच्चनच्या आवाजाला लोक कंटाळले!

मुंबई : प्रत्येक फोन कॉलपूर्वी वाजणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा जनजागृती कॉलर ट्यूनमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. ४० सेकंदांचा हा संदेश, कॉल कितीही महत्त्वाचा असो, लोकांना त्रास देत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्राय (TRAI) कडे याबाबत तक्रारींचा पाऊस पडत असून, सोशल मीडियावरही ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, एकदा-दोनदा ऐकल्यानंतर हा संदेश वारंवार ऐकणे असह्य झाले आहे.



सायबर सुरक्षेबद्दल जागृती करण्यासाठी प्रत्येक कॉलपूर्वी वाजणारी अमिताभ बच्चन यांची कॉलर ट्यून आता कोविड प्रतिबंधक संदेशाप्रमाणेच डोकेदुखी बनली आहे. कितीही तातडीचा कॉल असला तरी, ४० सेकंद हा आवाज ऐकूनच घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, जर कोणी मोठ्या संकटात सापडणार असेल आणि त्याला त्वरित मदत हवी असेल, तरी बच्चन साहेबांचा आवाज आधी ऐकावा लागतो. याच कारणामुळे, देशभरात लोकप्रिय असलेल्या या आवाजाबद्दल लोक तक्रारी करत आहेत आणि फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त करत आहेत.


गेल्या वर्षी सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून प्रत्येक कॉलपूर्वी वाजण्यास सुरुवात झाली होती. आता देशभरच्या त्रस्त नागरिकांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्रायकडे या सतत वाजणाऱ्या आवाजाबद्दल तक्रारी केल्या आहेत. तर, मोठ्या प्रमाणावर लोक सोशल मीडियावर ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी करत आहेत.


परंतू, दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, कॉलरला हा संदेश ऐकू येत असला तरी दुसऱ्या बाजूला फोन वाजण्यास सुरुवात होते. पण दूरसंचार तज्ञांच्या मते, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे की काही वेळा कॉलर ट्यून पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या बाजूला रिंग जाते.


एक-दोन कॉलमध्ये सायबर सुरक्षा संदेश ऐकण्यास कोणतीही अडचण नाही, परंतु एकाच नंबरवर अनेक वेळा कॉल केल्यावरही हा संदेश सतत येत राहतो, जे खूप त्रासदायक आहे. यात सुधारणा करणे आवश्यक आहे आणि जर ते शक्य नसेल तर ही कॉलर ट्यून बंद करावी, अशी मागणी आता केली जात आहे.


कोरोना काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ३० सेकंदांचा कोविड प्रतिबंधक संदेश प्रत्येक कॉलपूर्वी ऐकू येत होता आणि मोठ्या प्रमाणावर लोकांच्या विरोधानंतर तो बंद करण्यात आला. त्यावेळीही लोकांनी सरकारला दररोज पहिल्या कॉलपूर्वी अशी कॉलर ट्यून वाजवणे ठीक आहे, परंतु प्रत्येक कॉलवर ती येणे ही एक मोठी समस्या असल्याचे सुचवले होते.आता सायबर क्राइमसंदर्भात या कॉलर ट्यूनचीही तीच अवस्था झाली आहे.



हा सायबर अलर्ट आवाज काय आहे?


भारत सरकारच्या निर्देशानुसार, दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्येक आउटगोइंग कॉलपूर्वी एक इशारा संदेश ऐकवला जात आहे. या संदेशात वापरकर्त्यांना संशयित लिंक किंवा अज्ञात OTP कोणासोबतही शेअर न करण्यास आणि अनोळखी कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले जाते. हा ऑडिओ सुमारे ४० सेकंदांचा असतो आणि लोकांना सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करतो. याचा उद्देश लोकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवणे आहे, परंतु प्रत्येक कॉलवर वारंवार तोच संदेश येणे ही एक मोठी समस्या बनली आहे.

Comments
Add Comment

Bmc News : वांद्र्यातील नवपाडा, घासबाजारमधील तुंबणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा

दक्ष सहायक आयुक्तांमुळे रेल्वेला करावी लागली कल्व्हर्टची सफाई मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात

BMC : महापालिका आयुक्त तपासणार आता प्रत्येक अधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला गती देतानाच

gig worker : गिग आणि डिलिव्हरी कामगारांची सक्त पडताळणी

मुंबई : महाराष्ट्रातील स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीटसारख्या असंख्य ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आणि

crop registration : प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता

anna bhau sathe : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला गती देण्याचे निर्देश

मुंबई : घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ३३२.६२ कोटी रुपयांच्या

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त टूर सर्किट

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून