अमिताभ बच्चनच्या आवाजाला लोक कंटाळले!

मुंबई : प्रत्येक फोन कॉलपूर्वी वाजणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा जनजागृती कॉलर ट्यूनमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. ४० सेकंदांचा हा संदेश, कॉल कितीही महत्त्वाचा असो, लोकांना त्रास देत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्राय (TRAI) कडे याबाबत तक्रारींचा पाऊस पडत असून, सोशल मीडियावरही ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, एकदा-दोनदा ऐकल्यानंतर हा संदेश वारंवार ऐकणे असह्य झाले आहे.



सायबर सुरक्षेबद्दल जागृती करण्यासाठी प्रत्येक कॉलपूर्वी वाजणारी अमिताभ बच्चन यांची कॉलर ट्यून आता कोविड प्रतिबंधक संदेशाप्रमाणेच डोकेदुखी बनली आहे. कितीही तातडीचा कॉल असला तरी, ४० सेकंद हा आवाज ऐकूनच घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, जर कोणी मोठ्या संकटात सापडणार असेल आणि त्याला त्वरित मदत हवी असेल, तरी बच्चन साहेबांचा आवाज आधी ऐकावा लागतो. याच कारणामुळे, देशभरात लोकप्रिय असलेल्या या आवाजाबद्दल लोक तक्रारी करत आहेत आणि फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त करत आहेत.


गेल्या वर्षी सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून प्रत्येक कॉलपूर्वी वाजण्यास सुरुवात झाली होती. आता देशभरच्या त्रस्त नागरिकांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्रायकडे या सतत वाजणाऱ्या आवाजाबद्दल तक्रारी केल्या आहेत. तर, मोठ्या प्रमाणावर लोक सोशल मीडियावर ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी करत आहेत.


परंतू, दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, कॉलरला हा संदेश ऐकू येत असला तरी दुसऱ्या बाजूला फोन वाजण्यास सुरुवात होते. पण दूरसंचार तज्ञांच्या मते, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे की काही वेळा कॉलर ट्यून पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या बाजूला रिंग जाते.


एक-दोन कॉलमध्ये सायबर सुरक्षा संदेश ऐकण्यास कोणतीही अडचण नाही, परंतु एकाच नंबरवर अनेक वेळा कॉल केल्यावरही हा संदेश सतत येत राहतो, जे खूप त्रासदायक आहे. यात सुधारणा करणे आवश्यक आहे आणि जर ते शक्य नसेल तर ही कॉलर ट्यून बंद करावी, अशी मागणी आता केली जात आहे.


कोरोना काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ३० सेकंदांचा कोविड प्रतिबंधक संदेश प्रत्येक कॉलपूर्वी ऐकू येत होता आणि मोठ्या प्रमाणावर लोकांच्या विरोधानंतर तो बंद करण्यात आला. त्यावेळीही लोकांनी सरकारला दररोज पहिल्या कॉलपूर्वी अशी कॉलर ट्यून वाजवणे ठीक आहे, परंतु प्रत्येक कॉलवर ती येणे ही एक मोठी समस्या असल्याचे सुचवले होते.आता सायबर क्राइमसंदर्भात या कॉलर ट्यूनचीही तीच अवस्था झाली आहे.



हा सायबर अलर्ट आवाज काय आहे?


भारत सरकारच्या निर्देशानुसार, दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्येक आउटगोइंग कॉलपूर्वी एक इशारा संदेश ऐकवला जात आहे. या संदेशात वापरकर्त्यांना संशयित लिंक किंवा अज्ञात OTP कोणासोबतही शेअर न करण्यास आणि अनोळखी कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले जाते. हा ऑडिओ सुमारे ४० सेकंदांचा असतो आणि लोकांना सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करतो. याचा उद्देश लोकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवणे आहे, परंतु प्रत्येक कॉलवर वारंवार तोच संदेश येणे ही एक मोठी समस्या बनली आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत