अमिताभ बच्चनच्या आवाजाला लोक कंटाळले!

मुंबई : प्रत्येक फोन कॉलपूर्वी वाजणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा जनजागृती कॉलर ट्यूनमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. ४० सेकंदांचा हा संदेश, कॉल कितीही महत्त्वाचा असो, लोकांना त्रास देत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्राय (TRAI) कडे याबाबत तक्रारींचा पाऊस पडत असून, सोशल मीडियावरही ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, एकदा-दोनदा ऐकल्यानंतर हा संदेश वारंवार ऐकणे असह्य झाले आहे.



सायबर सुरक्षेबद्दल जागृती करण्यासाठी प्रत्येक कॉलपूर्वी वाजणारी अमिताभ बच्चन यांची कॉलर ट्यून आता कोविड प्रतिबंधक संदेशाप्रमाणेच डोकेदुखी बनली आहे. कितीही तातडीचा कॉल असला तरी, ४० सेकंद हा आवाज ऐकूनच घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, जर कोणी मोठ्या संकटात सापडणार असेल आणि त्याला त्वरित मदत हवी असेल, तरी बच्चन साहेबांचा आवाज आधी ऐकावा लागतो. याच कारणामुळे, देशभरात लोकप्रिय असलेल्या या आवाजाबद्दल लोक तक्रारी करत आहेत आणि फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त करत आहेत.


गेल्या वर्षी सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून प्रत्येक कॉलपूर्वी वाजण्यास सुरुवात झाली होती. आता देशभरच्या त्रस्त नागरिकांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्रायकडे या सतत वाजणाऱ्या आवाजाबद्दल तक्रारी केल्या आहेत. तर, मोठ्या प्रमाणावर लोक सोशल मीडियावर ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी करत आहेत.


परंतू, दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, कॉलरला हा संदेश ऐकू येत असला तरी दुसऱ्या बाजूला फोन वाजण्यास सुरुवात होते. पण दूरसंचार तज्ञांच्या मते, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे की काही वेळा कॉलर ट्यून पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या बाजूला रिंग जाते.


एक-दोन कॉलमध्ये सायबर सुरक्षा संदेश ऐकण्यास कोणतीही अडचण नाही, परंतु एकाच नंबरवर अनेक वेळा कॉल केल्यावरही हा संदेश सतत येत राहतो, जे खूप त्रासदायक आहे. यात सुधारणा करणे आवश्यक आहे आणि जर ते शक्य नसेल तर ही कॉलर ट्यून बंद करावी, अशी मागणी आता केली जात आहे.


कोरोना काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ३० सेकंदांचा कोविड प्रतिबंधक संदेश प्रत्येक कॉलपूर्वी ऐकू येत होता आणि मोठ्या प्रमाणावर लोकांच्या विरोधानंतर तो बंद करण्यात आला. त्यावेळीही लोकांनी सरकारला दररोज पहिल्या कॉलपूर्वी अशी कॉलर ट्यून वाजवणे ठीक आहे, परंतु प्रत्येक कॉलवर ती येणे ही एक मोठी समस्या असल्याचे सुचवले होते.आता सायबर क्राइमसंदर्भात या कॉलर ट्यूनचीही तीच अवस्था झाली आहे.



हा सायबर अलर्ट आवाज काय आहे?


भारत सरकारच्या निर्देशानुसार, दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्येक आउटगोइंग कॉलपूर्वी एक इशारा संदेश ऐकवला जात आहे. या संदेशात वापरकर्त्यांना संशयित लिंक किंवा अज्ञात OTP कोणासोबतही शेअर न करण्यास आणि अनोळखी कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले जाते. हा ऑडिओ सुमारे ४० सेकंदांचा असतो आणि लोकांना सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करतो. याचा उद्देश लोकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवणे आहे, परंतु प्रत्येक कॉलवर वारंवार तोच संदेश येणे ही एक मोठी समस्या बनली आहे.

Comments
Add Comment

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

उद्या आणि परवा मुंबईत पाणीबाणी!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८००

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

राष्ट्रीय, राज्यस्तरीय वगळता छोट्या पक्षांची होणार दमछाक मुंबई  : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

माहिममध्ये उबाठाकडे मनसेची खुल्या प्रभागांची मागणी, पाच पैंकी तीन खुले प्रभाग आपल्याकडे घेण्याचा मनसेचा विचार

मुंबई (सचिन धानजी):  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता

पिसे पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणार, आता केंद्राची क्षमता होणार १८२० दशलक्ष लिटर

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि

मुंबईतील अनधिकृत बांधकामांसाठी तक्रारींसाठी डॅशबोर्ड, महापालिकेने संस्थेची केली नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील अतिक्रमण हटवण्यासाठी आता महापालिकेच्यावतीने ट्रॅकींग सिस्टीम राबवण्यात येणार