अमिताभ बच्चनच्या आवाजाला लोक कंटाळले!

मुंबई : प्रत्येक फोन कॉलपूर्वी वाजणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा जनजागृती कॉलर ट्यूनमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. ४० सेकंदांचा हा संदेश, कॉल कितीही महत्त्वाचा असो, लोकांना त्रास देत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्राय (TRAI) कडे याबाबत तक्रारींचा पाऊस पडत असून, सोशल मीडियावरही ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, एकदा-दोनदा ऐकल्यानंतर हा संदेश वारंवार ऐकणे असह्य झाले आहे.



सायबर सुरक्षेबद्दल जागृती करण्यासाठी प्रत्येक कॉलपूर्वी वाजणारी अमिताभ बच्चन यांची कॉलर ट्यून आता कोविड प्रतिबंधक संदेशाप्रमाणेच डोकेदुखी बनली आहे. कितीही तातडीचा कॉल असला तरी, ४० सेकंद हा आवाज ऐकूनच घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, जर कोणी मोठ्या संकटात सापडणार असेल आणि त्याला त्वरित मदत हवी असेल, तरी बच्चन साहेबांचा आवाज आधी ऐकावा लागतो. याच कारणामुळे, देशभरात लोकप्रिय असलेल्या या आवाजाबद्दल लोक तक्रारी करत आहेत आणि फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त करत आहेत.


गेल्या वर्षी सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून प्रत्येक कॉलपूर्वी वाजण्यास सुरुवात झाली होती. आता देशभरच्या त्रस्त नागरिकांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्रायकडे या सतत वाजणाऱ्या आवाजाबद्दल तक्रारी केल्या आहेत. तर, मोठ्या प्रमाणावर लोक सोशल मीडियावर ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी करत आहेत.


परंतू, दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, कॉलरला हा संदेश ऐकू येत असला तरी दुसऱ्या बाजूला फोन वाजण्यास सुरुवात होते. पण दूरसंचार तज्ञांच्या मते, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे की काही वेळा कॉलर ट्यून पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या बाजूला रिंग जाते.


एक-दोन कॉलमध्ये सायबर सुरक्षा संदेश ऐकण्यास कोणतीही अडचण नाही, परंतु एकाच नंबरवर अनेक वेळा कॉल केल्यावरही हा संदेश सतत येत राहतो, जे खूप त्रासदायक आहे. यात सुधारणा करणे आवश्यक आहे आणि जर ते शक्य नसेल तर ही कॉलर ट्यून बंद करावी, अशी मागणी आता केली जात आहे.


कोरोना काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ३० सेकंदांचा कोविड प्रतिबंधक संदेश प्रत्येक कॉलपूर्वी ऐकू येत होता आणि मोठ्या प्रमाणावर लोकांच्या विरोधानंतर तो बंद करण्यात आला. त्यावेळीही लोकांनी सरकारला दररोज पहिल्या कॉलपूर्वी अशी कॉलर ट्यून वाजवणे ठीक आहे, परंतु प्रत्येक कॉलवर ती येणे ही एक मोठी समस्या असल्याचे सुचवले होते.आता सायबर क्राइमसंदर्भात या कॉलर ट्यूनचीही तीच अवस्था झाली आहे.



हा सायबर अलर्ट आवाज काय आहे?


भारत सरकारच्या निर्देशानुसार, दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्येक आउटगोइंग कॉलपूर्वी एक इशारा संदेश ऐकवला जात आहे. या संदेशात वापरकर्त्यांना संशयित लिंक किंवा अज्ञात OTP कोणासोबतही शेअर न करण्यास आणि अनोळखी कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले जाते. हा ऑडिओ सुमारे ४० सेकंदांचा असतो आणि लोकांना सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करतो. याचा उद्देश लोकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवणे आहे, परंतु प्रत्येक कॉलवर वारंवार तोच संदेश येणे ही एक मोठी समस्या बनली आहे.

Comments
Add Comment

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७