मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले; सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढा तलावांमध्ये पाणीसाठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठी झाल्याने पाणी कपातीचे संकट टळले आहे. जमा झालेले पाणी मुंबईला पुढील ९५ दिवसांसाठी म्हणजेच सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढे आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.


मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी जमा होणे गरजेचे असते. या साठ्यानुसार मुंबईच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते.


वर्षभर लागणारे पाणी जमा होण्यासाठी जूनपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होणे गरजेचे असते. मात्र, या वर्षी मेअखेर सुरू झालेल्या पावसाने सुरुवातीचा काही काळ धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने जलसाठा १० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आले होते. मात्र जूनमध्ये गेल्या दोन आठवड्यांत बरसलेल्या मान्सूनने कसर भरून काढली. सध्या या धरणांमध्ये २५ टक्के पाणी जमा झाले आहे. यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे मुंबईवरील पाणीसंकट टळले आहे.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती