मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले; सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढा तलावांमध्ये पाणीसाठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठी झाल्याने पाणी कपातीचे संकट टळले आहे. जमा झालेले पाणी मुंबईला पुढील ९५ दिवसांसाठी म्हणजेच सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढे आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.


मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी जमा होणे गरजेचे असते. या साठ्यानुसार मुंबईच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते.


वर्षभर लागणारे पाणी जमा होण्यासाठी जूनपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होणे गरजेचे असते. मात्र, या वर्षी मेअखेर सुरू झालेल्या पावसाने सुरुवातीचा काही काळ धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने जलसाठा १० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आले होते. मात्र जूनमध्ये गेल्या दोन आठवड्यांत बरसलेल्या मान्सूनने कसर भरून काढली. सध्या या धरणांमध्ये २५ टक्के पाणी जमा झाले आहे. यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे मुंबईवरील पाणीसंकट टळले आहे.

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पूजेत विरोधही होणार मवाळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा