IND vs ENG: तीन फलंदाजांची शतके, तरीही टीम इंडियाच्या नावे लाजिरवाणा विक्रम!

टीम इंडिया ४७१ धावांवर सर्वबाद, कसोटी इतिहासातील सर्वात कमी ऑलआउट धावसंख्या


लंडन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG First Test Match) यांच्यात हेडिंग्ले येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. ज्यामध्ये भारताच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावली. पण असे असूनही, भारताचा डाव ४७१ धावांवर घसरला. यामुळे, भारतीय संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जोडला गेला आहे.


कसोटी इतिहासातील हा चौथा सर्वात कमी ऑलआउट धावसंख्या आहे. यापूर्वी, दक्षिण आफ्रिका (४७५ धावा, २०१६), ऑस्ट्रेलिया (४९४ धावा, १९२४) आणि वेस्ट इंडिज (४९७ धावा, २००२) यांचा समावेश आहे.



भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी


हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी ज्या प्रकारचा खेळ दाखवला होता, दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना तशी कामगिरी करता आली नाही आणि टीम इंडियाने आपले शेवटचे ७ विकेट फक्त ४१ धावांत गमावले. एकेकाळी असे वाटत होते की टीम इंडियाचा स्कोअर ५०० च्या पुढे जाईल, परंतु पहिल्या डावात भारतीय संघ फक्त ४७१ धावाच करू शकला. खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारताचा चौथा विकेट ४३० धावांवर पडला आणि कर्णधार शुभमन गिल १४७ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर विकेट्सची एकच झुंज सुरू झाली.  टीम इंडिया ४७१ धावांवर गुंडाळली गेली.


दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन केले आणि टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यापासून रोखले. भारताने आपले शेवटचे ७ विकेट्स ४१ धावांवर गमावले, दुसऱ्या दिवशी भारताने गमावलेल्या ७ विकेट्समध्ये शुभमन गिल, ऋषभ पंत, करुण नायर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश होता. यापैकी करुण नायर आणि बुमराह यांना तर खातेही उघडता आले नाही, तर शार्दुल एक धाव करून तंबूत परतला.  जडेजाने ११ धावांची खेळी केली.



जोश टोंक आणि बेन स्टोक्सने विकेट्स


दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोसळली. कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंगने इंग्लंडकडून शानदार गोलंदाजी केली. या दोघांनी प्रत्येकी भारताचे प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. याशिवाय, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवता आला. = या डावात तीन भारतीय फलंदाजांनी शतके केली, परंतु इतर फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते टीम इंडियासाठी निराशाजनक होते.



गिल, पंत आणि जयस्वालने झळकावले शतक


२०१९ मध्ये सिडनीमध्ये ६२२/७ घोषित केल्यानंतर ही खेळी भारताची परदेशी भूमीवरील सर्वात मोठी पहिली खेळी ठरली आहे. इंग्लंडमध्येही २००७ च्या ओव्हल कसोटीनंतर (६६४ धावा) पहिल्या डावात भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. तथापि, भारतीय फलंदाजांची सुरुवात जबरदस्त होती. या सामन्यात गिलने १४७ धावा केल्या, तर पंतने १३४ धावा केल्या. त्याच वेळी, यशस्वीने १०१ धावा केल्या. परंतु मधल्या फळीतील आणि खालच्या फळीत योगदान न मिळाल्याने संघ मोठ्या धावसंख्येपासून वंचित राहिला. तरीही, ही खेळी तीन शतकांमुळे ऐतिहासिक ठरली.  


 
Comments
Add Comment

FIFA : वर्णद्वेषी टिप्पणीवरून किलियन एम्बाप्पेचा पॅराग्वे सिनेटरला सणसणीत प्रत्त्युत्तर

फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappé) याने आपल्यावरील वर्णद्वेषी टीकेला अत्यंत आक्रमक आणि चोख

FIFA : ट्रम्प यांचा फुटबॉलमध्ये राजकीय हस्तक्षेप; फिफाच्या रेड कार्ड निर्णयावर जागतिक वादंग

सिएटल: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेचा स्टार स्ट्रायकर फोलारिन बालोगुन याच्यावरील रेड-कार्ड बंदी फिफाने

FIFA WORLDCUP 2026 : विश्वचषकातून अमेरिकेचे आव्हान संपुष्टात; बेल्जियमची उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिएटल: सिएटलच्या ल्युमेन फील्डवर सोमवारी रात्

FIFA WORLDCUP 2026 : स्पेन उपांत्यपूर्व फेरीत; रोनाल्डोच्या विश्वचषक कारकिर्दीचा शेवट

आर्लिंग्टन, टेक्सास: मिकेल मेरिनोच्या अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे स्पेनने पोर्तुगालचा १-० ने पराभव करत

Cristiano Ronaldo : ‘हाच माझा शेवटचा विश्वचषक!’ क्रिस्टियानो रोनाल्डोच्या भावनिक घोषणेनंतर फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का

नवी दिल्ली : जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आपल्या

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा महिला टी-२० क्रिकेटवर दबदबा कायम; इंग्लंडला हरवत विक्रमी सातव्यांदा विश्वविजेते

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध करत टी-२०