Gold Silver Rate: सोन्याच्या दरात पुन्हा 'वाढ' सोन्याचा दर १००७५० प्रति तोळा चांदीत स्थिरता कायम 'हे' कारण जबाबदार!

प्रतिनिधी: सोन्याचांदीच्या दरात काल झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात कुठलाही बदल झाला नाही. आज सकाळपर्यंत सोन्याच्या दरात 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याच्या दरात २७ रुपयांनी वाढ झालेली असल्याने प्रति ग्रॅम किंमत १००७५ रूपयांवर पोहोचली आहे. २४ कॅरेट प्रति तोळा किंमत २७० रुपयाने वाढत १००७५० रूपयांवर गेली आहे.याखेरीज २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम किंमत २५ रुपयांनी वाढत ९२३५ रुपयांना तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत २५० रुपयांनी वाढत ९२३५० रूपये गेली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत २० रुपयाने वाढत ७५५६ रूपये झाली. तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत २०० रूपयांनी वाढत ७५५६० रूपयांवर पोहोचली आहे.


एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मधील सोन्याच्या निर्देशांकात ०.०१% घसरण झाली होती त्यामुळे एमसी एक्स गोल्ड पातळी ९९०९६ रुपयांवर आहे. तसेच जागतिक पातळीवर सोन्याच्या निर्देशांकात घसरण पहायला मिळत आहे. गोल्ड फ्युचर (Gold Future) मध्ये ०.६६% घसरण झाली आहे. काल युएस गोल्ड स्पॉट (Gold Spot Index) यामध्ये ०.०७% घसरण झाली होती.


एकूण जागतिक पातळीवर इस्त्राईल व इराण यांच्यातील युद्धामुळे मंदीची लाट येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होते. सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढल्याने यापूर्वी किंमत पातळी उच्चांक होती. मात्र सोनाच्या वाढत्या दरामुळे लोकांनी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कानाडोळा केल्याने पुरवठ्यापेक्षा मागणी घटली दुसरीकडे आरबीआयच्या नुकत्याच प्रोजेक्ट फायनांसिंग घोषणेनंतर लोकांची गुंतवणूक रिअल इस्टेट क्षेत्रात अधिक होऊ शकते. युएस फेडरल रिझ र्व्ह व्याजदरात कपात न झाल्याने व मध्यपूर्वेकडील अमेरिकचा बाजारात कल मोठ्या अंकाने बाजार कोसळला होता व डॉलरच्या तुलनेत रुपयाची १६ पैशांची घसरण झाल्यानंतर बाजारात सोन्याचे दर नियंत्रित राहण्यास मदत झाली होती.


मात्र आज पुन्हा कच्च्या तेलाच्याबरोबरच अमेरिकन बाजारातील घसरणीनंतर बाजारात अस्थिरता कायम राहिली आहे. विशेषतः फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी आगामी काळात टेरिफ व इतर कारणांमुळे महागाईत वाढ होऊ शकते असे म्हटले होते. त्यानंतर वाढती बेरोजगारी व महागाई येऊ शकते या भाकीतानंतर गुंतवणूकदारांनी सावधतेचा पवित्रा घेतला होता. व आता सोन्यातील गुंतवणूक वाढण्याची पुन्हा एकदा शक्यता वर्तवली जात आहे.बाजारातील अस्थिरता आणि भू-राजकीय चिंता यांच्यात, तज्ञांचा असा विश्वास आहे की सोने आणि चांदी ही सुरक्षित गुंतवणूक आहे; तथापि, त्यांचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये धोरणात्मकपणे समावेश केला पाहिजे.


चांदीत कुठलाही बदल नाही!


आज चांदीच्या किंमतीत कुठलाही बदल न झाल्याने किंमती स्थिर राहिल्या आहेत. १ ग्रॅम चांदीची किंमत ११० रूपये रूपये व एक किलो चांदीचे दर ११००० रूपयांवर कायम आहेत.तर काल चांदीची प्रति ग्रॅम किंमत १०६५७ रूपये होती.एम सीएक्सवर चांदीच्या दरात ०.०५% किरकोळ वाढ झाल्याने एमसीएक्सवरील चांदीचा निर्देशांक १०६२७५.०० पातळीवर पोहोचला आहे. काल सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. २४ कॅरेट सोन्याची प्रति तोळा किंमत १००४८० रूपयां वर व २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ९२१०० होती.

Comments
Add Comment

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Banjara Reservation : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षणासाठी ‘हैदराबाद गॅझेट’चा आधार घेतल्यानंतर, आता त्याच धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम

Budget Session : कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविली

मुंबई : राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन