इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची घरवापसी, सुरक्षित परतीचे काम सुरू

'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीच्या कामाला सुरुवात  


इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, भारताने इराणमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी घेऊन येण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार मशहादहून निघालेले पहिले चार्टर्ड विमान शुक्रवारी रात्री ११:४० वाजता दिल्लीला पोहोचले. दुसरे विमान आज सकाळी १० वाजता येणार आहे. या मोहिमेदरम्यान इराणमधील एकूण १,००० भारतीय परतण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी आणखी दोन विमानांद्वारे भारतीयांना सुखरूप आणले जाईल. 


भारताने 'ऑपरेशन सिंधू' सुरू करून आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत, इराणमधील मशहादहून पहिले चार्टर्ड विमान शुक्रवारी रात्री ११:४० वाजता नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या विमानाने इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणले आहे.  



इराणच्या एयर चार्टड विमानांचा वापर


भारत सरकार टप्प्याटप्प्याने मशहादहून एकूण १,००० भारतीयांना परत आणत आहे. या बचाव कार्यासाठी इराणच्या महन एअर चार्टर्ड विमानांचा वापर केला जात आहे.



आम्ही भारतीयांना आमच्या स्वतःच्या लोकांसारखे मानतो


इराणमधील भारतीय दूतावासाचे उपप्रमुख मोहम्मद जवाद हुसैनी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, "आम्ही भारतीयांना आमच्या स्वतःच्या लोकांसारखे वागवतो. इराणचे हवाई क्षेत्र बंद आहे परंतु आम्ही भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ते तात्पुरते उघडण्याची व्यवस्था करत आहोत." इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, "पहिले विमान शुक्रवारी रात्री दिल्लीला पोहोचेल आणि शनिवारी आणखी दोन विमाने भारतासाठी रवाना होतील." दुसरे विमान शनिवारी सकाळी अश्गाबातहून निघून सकाळी १० वाजता दिल्लीला पोहोचेल, तर तिसरे विमान शनिवारी संध्याकाळी भारतात पोहोचेल.


इराण आणि इस्रायलमधील परिस्थिती सतत बिघडत असून, या देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे हे मदतीचे पाऊल उचलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, भारत सरकारने तत्परता दाखवत ऑपरेशन सिंधू सुरू केले, जेणेकरून केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर इतर अडकलेल्या भारतीय नागरिकांनाही सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की सरकार आपल्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि या संकटाच्या वेळी आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे.

Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या