पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

भात रोपांची पेरणी लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला


पालघर : पालघर जिल्ह्यात १६ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ व २२ जून रोजी पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी उघडीपही राहू शकते. २३ जूननंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. २४ ते २६ जून दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


तसेच, २७ जून ते ३ जुलै या कालावधीत देखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. ही माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली आहे. या कालावधीत किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर राहील. वाऱ्याचा वेग २३ ते २५ जूनदरम्यान २० किमी प्रतितास इतका वाढण्याची शक्यता असून, त्याचा फळबागांवर परिणाम होऊ शकतो.


या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. दि. २१ आणि २२ जून रोजी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता असल्याने भात रोपवाटीकेची पेरणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी केले आहे.


गादी वाफ्यावर भात पेरणी करताना चारही बाजूंनी खोल चर काढावेत जेणेकरून जास्त पावसातही पाण्याचा निचरा होईल आणि कोवळी रोपे सडण्याचे प्रमाण कमी राहील. नुकतीच लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार देऊन बांधणी करावी व मातीची भर टाकावी. निचऱ्याची व्यवस्था करून ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


Comments
Add Comment

खाजगीकरणा विरोधात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने; ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा

पालघर : वीज कंपन्यांमधील खाजगीकरण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि

Vasai Factory Fire: वसईत कारखान्याला भीषण आग

वसई: वसईत तुंगारेश्वर फाटा येथील पुठ्ठा कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील अनेक

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५