पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

भात रोपांची पेरणी लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला


पालघर : पालघर जिल्ह्यात १६ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ व २२ जून रोजी पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी उघडीपही राहू शकते. २३ जूननंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. २४ ते २६ जून दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


तसेच, २७ जून ते ३ जुलै या कालावधीत देखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. ही माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली आहे. या कालावधीत किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर राहील. वाऱ्याचा वेग २३ ते २५ जूनदरम्यान २० किमी प्रतितास इतका वाढण्याची शक्यता असून, त्याचा फळबागांवर परिणाम होऊ शकतो.


या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. दि. २१ आणि २२ जून रोजी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता असल्याने भात रोपवाटीकेची पेरणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी केले आहे.


गादी वाफ्यावर भात पेरणी करताना चारही बाजूंनी खोल चर काढावेत जेणेकरून जास्त पावसातही पाण्याचा निचरा होईल आणि कोवळी रोपे सडण्याचे प्रमाण कमी राहील. नुकतीच लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार देऊन बांधणी करावी व मातीची भर टाकावी. निचऱ्याची व्यवस्था करून ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


Comments
Add Comment

Vasai Fort : 'मला मराठी येत नाही!' म्हणत वसई किल्ल्यावर सुरक्षा रक्षकाचा माज; शिवरायांच्या वेशातील युवकाला फोटो काढण्यास मज्जाव!

पालघर : वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर (Vasai Fort) दीपोत्सवाच्या (Deepotsav) शुभदिनी एक अनपेक्षित आणि वादग्रस्त घटना

विरारमधील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; मोठे आर्थिक नुकसान

विरार: विरार पूर्वेकडील आरजे सिग्नलजवळ असलेल्या एका फर्निचरच्या मोठ्या दुकानाला २१ ऑक्टोबरच्या दुपारी भीषण आग

रिचा पाटीलच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट विरार : विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १९

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी