ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे ठप्प ; गुजरात मधून येणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या...

पालघर : मुंबईकडून अजमेरच्या दिशेने जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेस (Ajmer Express Train) पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये दोष झाल्याचे निष्पन्न होऊन विद्युत तारा तुडल्याच्या निदर्शनास आले, त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच मुंबईतून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवून दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुरुस्तीच्या कामासाठी काही अवधी जाऊ शकतो अशी शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

रेल्वेचा तांत्रिक बिघाड साधारणपणे ७:30 च्या सुमारास झाला आहे अशी माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली. रेल्वे प्रशासनाने सर्तकता दाखवत सायरन वाजून लोकांना अलर्ट केल्याने लोकांनमध्ये भीतीचं वातावरण आहे. अजमेर ट्रेन गुजरातकडे जाणारी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर एक नंबर व दोन नंबर ट्रॅक क्रॉस करत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुडली. या घटनेमुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली. पाऊस सुरु असल्यामुळे  खबरदारी म्हणून रेल्वे  प्रवाशांनी ट्रॅक वरुन उतरणे किंवा चालणे टाळावे. अशा सुचना रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आहेत.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Janhavi kapoor :वजन कमी करण्यासाठी जान्हवी कपूरने दिला सल्ला; म्हणाली…

वजन वाढणे किंवा वजन कमी होणे या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या विविध

Sairat :आकाश सोबतच्या पोस्टवर अखेर रिंकू राजगुरूने स्वत: केला खुलासा !

सैराट चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टिला एक वेगळी दिशा मिळाली. जगभरात १०० कोटींची कमाई करणारा 'सैराट' हा पहिला

Ranveer singh :धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वरील बंदी प्रकरणी FWICE चा खुलासा

मुंबई : धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वर बॉलिवूडने बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आले. या प्रकरणी आता

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nashik : शाळेत प्रवेश द्या; मी अंध आहे, ही माझी चूक आहे का? प्रवेशासाठी अंध विद्यार्थ्याचे आर्त आवाहन

नाशिक : “मी अंध आहे, ही माझी चूक आहे का? मला शिकण्याचा अधिकार नाही का?” असा हृदय पिळवटून टाकणारा सवाल एका गरीब अंध