ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे ठप्प ; गुजरात मधून येणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या...

  96

पालघर : मुंबईकडून अजमेरच्या दिशेने जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेस (Ajmer Express Train) पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये दोष झाल्याचे निष्पन्न होऊन विद्युत तारा तुडल्याच्या निदर्शनास आले, त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच मुंबईतून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवून दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुरुस्तीच्या कामासाठी काही अवधी जाऊ शकतो अशी शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

रेल्वेचा तांत्रिक बिघाड साधारणपणे ७:30 च्या सुमारास झाला आहे अशी माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली. रेल्वे प्रशासनाने सर्तकता दाखवत सायरन वाजून लोकांना अलर्ट केल्याने लोकांनमध्ये भीतीचं वातावरण आहे. अजमेर ट्रेन गुजरातकडे जाणारी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर एक नंबर व दोन नंबर ट्रॅक क्रॉस करत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुडली. या घटनेमुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली. पाऊस सुरु असल्यामुळे  खबरदारी म्हणून रेल्वे  प्रवाशांनी ट्रॅक वरुन उतरणे किंवा चालणे टाळावे. अशा सुचना रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आहेत.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

सत्तेचा गड राखणारे थोरात की, सत्ता उखाडणारे विखे?

पंचायत ते नगर परिषदेच्या प्रत्येक मतांवर विखे-थोरात संघर्षाची छाया शिर्डी : सतत आठ पंचवार्षिक आमदारकी व

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान

मुंबई : आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण १४००

भंडारदरा परिसरातील वाकी बंधारा ओव्हर फ्लो

अकोले : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाकी येथील लघुवबंधारा

Kokan Railway: कोकण रेल्वेचे गणपती स्पेशल आरक्षण २३ जूनपासून

रत्नागिरी : कोकणात मोठ्या स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे जादा गाड्यांसह नियमित

मुरबाडमध्ये मण्यार सापाचा वावर वाढला

नागरिकांना आरोग्य विभागाची खबरदारी घेण्याचे आवाहन मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील विशेषतः मुरबाड तालुक्यातील

IND vs ENG : यशस्वी जायसवालचे ऐतिहासिक शतक, लीड्समध्ये भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघ फलंदाजी