ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे ठप्प ; गुजरात मधून येणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या...

पालघर : मुंबईकडून अजमेरच्या दिशेने जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेस (Ajmer Express Train) पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये दोष झाल्याचे निष्पन्न होऊन विद्युत तारा तुडल्याच्या निदर्शनास आले, त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच मुंबईतून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवून दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुरुस्तीच्या कामासाठी काही अवधी जाऊ शकतो अशी शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

रेल्वेचा तांत्रिक बिघाड साधारणपणे ७:30 च्या सुमारास झाला आहे अशी माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली. रेल्वे प्रशासनाने सर्तकता दाखवत सायरन वाजून लोकांना अलर्ट केल्याने लोकांनमध्ये भीतीचं वातावरण आहे. अजमेर ट्रेन गुजरातकडे जाणारी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर एक नंबर व दोन नंबर ट्रॅक क्रॉस करत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुडली. या घटनेमुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली. पाऊस सुरु असल्यामुळे  खबरदारी म्हणून रेल्वे  प्रवाशांनी ट्रॅक वरुन उतरणे किंवा चालणे टाळावे. अशा सुचना रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आहेत.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं