मेट्रो-३ मार्गिकेच्या बीकेसी, वरळी स्थानकांत छतातून पाणी गळती

मुंबई : मुंबई मेट्रो-३ प्रकल्पातील बीकेसी आणि वरळी स्थानकांमध्ये गळतीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी साचल्याच्या घटनेनंतर आता वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मेट्रो स्थानकात भिंतींना ओलावा, छतातून पाणी गळती असे दृश्य दिसून येत आहेत. याआधी गळती रोखण्यासाठी एमएमआरसीने पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.


आता गळतीच्या ठिकाणी कर्मचारी सातत्याने पाणी पुसताना दिसत आहेत. प्रवाशांनीही यासंदर्भात सोशल मीडियावर फोटो शेअर करत टीका केली आहे.


सर्वसामान्य नागरिक, प्रवाशांनी समाजमाध्यमांवर मेट्रो स्थानकातील गळतीची छायाचित्रे, चित्रफिती पोस्ट करून 'मेट्रो-३'च्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. वरळी आणि बीकेसी मेट्रो स्थानकांत होत असलेल्या गळतीविषयी विचारणा केली असता एमएमआरसीने बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप फेटाळून लावला. काही ठिकाणी गळतीच्या किरकोळ समस्या उद्भवत असून त्याची कंत्राटदारांकडून तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात येत आहेत.


मेट्रो ३ वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासूनचा हा पहिलाच पावसाळा आहे. त्यामुळे आवश्यक ती दुरुस्ती करून घेतली जात आहे.

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे