धक्कादायक ! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर, नवी मुंबईत स्लॅब पडून शिक्षिकेला दुखापत...

नवीमुंबई : नेरुळ महानगरपालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation School)  शाळेत धक्कादायक प्रकार घडल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  नवी मुंबईतील नेरुळ, सेक्टर ३० मध्ये महापालिकेच्या शाळेला १७ कोटी रुपये खर्च करुन नव्याने बांधकाम करण्यात आले होते. शाळेत शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत असताना इमारतीच्या स्लॅबचा प्लास्टरचा भाग कोसळल्याने वर्गशिक्षिका थोडक्यात बचावली...

नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा १६ जून रोजी सुरु झाली,  इयत्ता सहावीच्या वर्गात एकून ३६ विद्यार्थी होते,  शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत असताना सॅल्बचा प्लस्टारचा भाग शिक्षिकेचा डोक्यावर पडला त्यामुळे शिक्षिकेला किरकोळ दुखापत झाली. विशेष म्हणजे शाळा सुरु होऊन फक्त चार दिवस झाले होते, त्यामुळे घडलेला प्रकाराबद्दल स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच याच इमारतीत आठवी आणि दहावीचे वर्ग सुरु करण्यात आल्याने इमारतीला काही भागात तडे देखील गेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे काही वर्गात पाणी जमा होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होताना पाहायाला मिळत आहे. मुळातच शालेच्या गच्चीवर प्लास्टिकच्या तीन टाक्या ठेवल्या आहेत, त्यातील एक टाकी तुटली आहे. गच्चीवर प्लास्टिकची टाकी न ठेवता सिमेंटची टाकी ठेवावी अस मत पालकांनी व्यक्त केलंय.  इमारतीचंं नव्याने करण्यात आलेले बांधकाम हे निष्कृष्ट दर्जाचे आहे अशी खंत पालकांनी व्यक्त केली.

शालेय नियमानुसार शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा लावणे गरजेचे आहे. पण या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशी तेथील स्थानिकांनी माहिती दिली.  तसेच निष्कृष्ट दर्जेचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी पालकांनी केली.

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

कुर्ला पश्चिम भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा आता बंदोबस्त...

मुंबई (सचिन धानजी) : कुर्ला पश्चिम येथील प्रिमियर नाल्याला जोडणाऱ्या भारतीय नगर नाला आणि विनोबा भावे नाल्याचे

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’ — उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांच्या प्रभावी कॅरेक्टर पोस्टर्सचे अनावरण

अधिक ताकदवान, अधिक काळोख, अधिक खोल: ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्च अखेरीस सुरू

पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्पाने यापूर्वी

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे