शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात १०० कोटींचा घोटाळा

जालना : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने अनुदान वाटप प्रक्रिया सुरू केली. या अनुदानाच्या वाटपात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी हा घोटाळा उघड केला. अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी दोषी आढळलेल्या २१ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. घोटाळा प्रकरणी SIT अथवा CBI मार्फत सखोल तपास करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे.

जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडले होते. शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ४१२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. या अनुदानाचे वाटप करतेवेळी १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला. काही अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे दाखवून अनुदान लाटले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार ३४.९७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. पण भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. अंबड, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये हा घोटाळा झाला. यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश आहे, असा आरोप भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. जालना येथे जिल्हा नियोजन समितीची १४ जून २०२५ रोजी बैठक झाली. या बैठकीत पहिल्यांदाच भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला.

घोटाळा प्रकरणी कारवाई झालेल्या २१ अधिकाऱ्यांमध्ये १० तलाठी आणि ११ इतर अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीने अंबड आणि घनसावंगीतील ८० गावांची फेरतपासणी केली. यात ७४ कर्मचारी दोषी आढळले आहेत. आणखी १५ जणांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. काम करत असलेल्या पाच तहसीलदार आणि पाच नायब तहसीलदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत पाच कोटी ७४ लाख रुपये वसूल केले आहेत. इतर वसुलीसाठी अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे. एकूण दोन लाख ५७ हजार २९७ शेतकऱ्यांपैकी एक लाख ९४ हजार ११३ जणांना अनुदान मिळाले आहे. तर ६३ हजार १८४ शेतकऱ्यांचे अनुदान आणि १५ हजार ३१ जणांचे ई-केवायसी (e-KYC) प्रलंबित आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षांतील अनुदान वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त