शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात १०० कोटींचा घोटाळा

जालना : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने अनुदान वाटप प्रक्रिया सुरू केली. या अनुदानाच्या वाटपात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी हा घोटाळा उघड केला. अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी दोषी आढळलेल्या २१ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. घोटाळा प्रकरणी SIT अथवा CBI मार्फत सखोल तपास करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे.

जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडले होते. शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ४१२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. या अनुदानाचे वाटप करतेवेळी १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला. काही अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे दाखवून अनुदान लाटले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार ३४.९७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. पण भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. अंबड, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये हा घोटाळा झाला. यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश आहे, असा आरोप भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. जालना येथे जिल्हा नियोजन समितीची १४ जून २०२५ रोजी बैठक झाली. या बैठकीत पहिल्यांदाच भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला.

घोटाळा प्रकरणी कारवाई झालेल्या २१ अधिकाऱ्यांमध्ये १० तलाठी आणि ११ इतर अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीने अंबड आणि घनसावंगीतील ८० गावांची फेरतपासणी केली. यात ७४ कर्मचारी दोषी आढळले आहेत. आणखी १५ जणांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. काम करत असलेल्या पाच तहसीलदार आणि पाच नायब तहसीलदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत पाच कोटी ७४ लाख रुपये वसूल केले आहेत. इतर वसुलीसाठी अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे. एकूण दोन लाख ५७ हजार २९७ शेतकऱ्यांपैकी एक लाख ९४ हजार ११३ जणांना अनुदान मिळाले आहे. तर ६३ हजार १८४ शेतकऱ्यांचे अनुदान आणि १५ हजार ३१ जणांचे ई-केवायसी (e-KYC) प्रलंबित आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षांतील अनुदान वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे