Pratap Sarnaik : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रुग्णालयात

ठाणे : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ताप आला आणि अंगदुखीचा त्रास वाढला. यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजारी असल्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर बुधवारपासूनच उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी प्रताप सरनाईक यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कमंत्री म्हणून कार्यरत आहेत. तब्येत बिघडल्यामुळे बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तापामुळे प्रताप सरनाईक यांना अशक्तपणा जाणवत आहे. पण त्यांच्या कोरोना, डेंग्यू आणि टायफॉइडच्या आतापर्यंत केलेल्या चाचण्या नकारात्मक आल्या. सरनाईक यांना कोरोना, डेंग्यू, टायफॉइड झालेला नाही, असे चाचणीचे अहवाल बघून डॉक्टरांकडून सांगण्यात आले. उपचार सुरू आहेत आणि प्रताप सरनाईक विश्रांती घेत आहेत. लवकरच त्यांच्या तब्येतीला आराम पडेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे