DNA : भारताची सर्वात मोठी डीएनए जुळवणी मोहीम!

जीवन आणि मृत्यूचा लढा: डीएनए प्रोफाइलिंगची कहाणी


अहमदाबाद : अहमदाबाद - लंडन एअर इंडिया विमान अपघातानं संपूर्ण देश हादरला. या भीषण अपघातात २७४ हून अधिक जणांनी प्राण गमावले. मृतदेहांचे कोळसे झाले. मृतांची ओळख पटवणं हे मोठं आव्हान निर्माण झालं. मात्र या संकटात एक आशेचा किरण ठरले ते भारताचे फॉरेन्सिक तज्ज्ञ. भारतात आतापर्यंतची सर्वात मोठी DNA जुळवणी मोहीम यशस्वीपणे राबवली गेली. चला तर जाणून घेऊया या लेखातून अशक्यप्राय मिशनची कहाणी, जिथे विज्ञान, मेहनत आणि माणुसकी एकत्र आली.



अहमदाबाद विमान दुर्घटना भारताच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस. अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट AI १७१ चं विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच पडलं आणि आगीच्या ज्वाळांमध्ये लपटलं. एक हजार डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानामुळे प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवणं जवळपास अशक्य झालं. मात्र या संकटात भारताच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी एक चमत्कार घडवला. गांधीनगरच्या फॉरेन्सिक सायन्स डायरेक्टरेट आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या टीमने तातडीने कामाला सुरुवात केली. अपघातस्थळ सील करून ३०० हून अधिक नमुने गोळा केले. राजकोट, सुरत आणि वडोदऱ्याच्या फॉरेन्सिक लॅबमधून डीएनए मॅचिंग किट्स आणि उपकरणं आणली गेली. ४० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २०० कर्मचारी रात्रंदिवस हे मिशन यशस्वी करण्यासाठी धडपडत होते.



मृतांच्या नातेवाईकांचे २५० हून अधिक रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले. जळालेल्या हाडांमधून आणि ऊतींमधून डीएनए काढण्याचं आव्हानात्मक काम सुरू झालं. आरटी-पीसीआर आणि सिक्वेन्सिंगद्वारे तपशीलवार डीएनए प्रोफाइल्स तयार केली गेली. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अनुवांशिक घटकांची ओळख पटवली गेली. अपघातात मृतदेहांचे चेहरे, बोटांचे ठसे, दात नष्ट झालेले होते. डीएनए प्रोफाइलिंग हाच एकमेव विश्वसनीय पर्याय होता. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट होती, मात्र फॉरेन्सिक टीमने अवघ्या ३६ तासांत पहिल्या मृतदेहाची ओळख पटवली. अपघातानंतर अवघ्या सात दिवसांत २१० मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं. २०४ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. ज्यात ३० ब्रिटिश आणि ४ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. या मिशनमुळे भारताची फॉरेन्सिक क्षमता जगाने पाहिली आणि जागतिक पातळीवर चर्चा झाली.

डीएनए जुळवणं हे मिशन केवळ तांत्रिक यश नव्हतं, तर माणुसकीचा विजय होता. कमी वेळेत मृतदेहांची ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं. भावनिक आव्हानांना सामोरे जावं लागत होतं. या सर्व अडचणींवर मात करत फॉरेन्सिक टीमने अशक्य ते शक्य करून दाखवलं. संकट काळात भारताच्या सामर्थ्याची, विज्ञानाची आणि माणुसकीची 'एकी' दिसली. या डीएनए जुळवणी मोहिमेने भारत एकजुटीने आणि ताकदीने पुढे जातो, हे भारताने जगाला दाखवून दिलं.
Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या