पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर २४  किलो ९६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई सीमा शुल्क विभागाकडून करण्यात आली.  गांजाची तस्करी थायलंडहून करण्यात आली असून, यात दोन प्रवाशांसह गांजाची खरेदी करण्यात आलेल्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.  या गांजाची किंमत २४ कोटी ६६ लाख रुपये  असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे.

मुंबई विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली.  त्यांच्या सामानात हिरव्या रंगाची पाने सापडली असून हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले... त्याच दरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिघांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे मोबाईल देखील तपासासाठी घेण्यात आले.

मोबाईलमधील संभाषणाद्वारे परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली असून संबंधित आरोपींचा शोध सुरु आहे.  अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  पर्यटनाच्या नावाखाली अनेक प्रवाशी भारताता येतात,  त्यामुळे गांजाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. अशी माहिती चौकशी दरम्यान पुढे आली. गांजाची निर्मीती दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर होतं असते. गेल्या सहा महिन्यात १०० कोटीहून अधिक प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. बँकाॅकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येते. अशी सीमा शुल्क विभागाने माहिती दिली.....

 

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये

वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी