पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर २४  किलो ९६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई सीमा शुल्क विभागाकडून करण्यात आली.  गांजाची तस्करी थायलंडहून करण्यात आली असून, यात दोन प्रवाशांसह गांजाची खरेदी करण्यात आलेल्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.  या गांजाची किंमत २४ कोटी ६६ लाख रुपये  असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे.

मुंबई विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली.  त्यांच्या सामानात हिरव्या रंगाची पाने सापडली असून हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले... त्याच दरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिघांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे मोबाईल देखील तपासासाठी घेण्यात आले.

मोबाईलमधील संभाषणाद्वारे परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली असून संबंधित आरोपींचा शोध सुरु आहे.  अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  पर्यटनाच्या नावाखाली अनेक प्रवाशी भारताता येतात,  त्यामुळे गांजाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. अशी माहिती चौकशी दरम्यान पुढे आली. गांजाची निर्मीती दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर होतं असते. गेल्या सहा महिन्यात १०० कोटीहून अधिक प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. बँकाॅकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येते. अशी सीमा शुल्क विभागाने माहिती दिली.....

 

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि

मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर! ६७ जणांना उमेदवारी

मुंबई: महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपासाठी बैठकींचा धडाका सुरू आहे. राज्यात

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

मुंबई: नव्या वर्षाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रेल्वेकडून नागरिकांना नवा वर्षीची भेट मिळाली आहे. मुंबईतील

मुंबईत शरद पवार गटाला धक्का! राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास