पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर २४  किलो ९६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई सीमा शुल्क विभागाकडून करण्यात आली.  गांजाची तस्करी थायलंडहून करण्यात आली असून, यात दोन प्रवाशांसह गांजाची खरेदी करण्यात आलेल्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.  या गांजाची किंमत २४ कोटी ६६ लाख रुपये  असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे.

मुंबई विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली.  त्यांच्या सामानात हिरव्या रंगाची पाने सापडली असून हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले... त्याच दरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिघांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे मोबाईल देखील तपासासाठी घेण्यात आले.

मोबाईलमधील संभाषणाद्वारे परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली असून संबंधित आरोपींचा शोध सुरु आहे.  अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  पर्यटनाच्या नावाखाली अनेक प्रवाशी भारताता येतात,  त्यामुळे गांजाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. अशी माहिती चौकशी दरम्यान पुढे आली. गांजाची निर्मीती दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर होतं असते. गेल्या सहा महिन्यात १०० कोटीहून अधिक प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. बँकाॅकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येते. अशी सीमा शुल्क विभागाने माहिती दिली.....

 

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक