पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

  120

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर २४  किलो ९६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई सीमा शुल्क विभागाकडून करण्यात आली.  गांजाची तस्करी थायलंडहून करण्यात आली असून, यात दोन प्रवाशांसह गांजाची खरेदी करण्यात आलेल्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.  या गांजाची किंमत २४ कोटी ६६ लाख रुपये  असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे.

मुंबई विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली.  त्यांच्या सामानात हिरव्या रंगाची पाने सापडली असून हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले... त्याच दरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिघांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे मोबाईल देखील तपासासाठी घेण्यात आले.

मोबाईलमधील संभाषणाद्वारे परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली असून संबंधित आरोपींचा शोध सुरु आहे.  अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  पर्यटनाच्या नावाखाली अनेक प्रवाशी भारताता येतात,  त्यामुळे गांजाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. अशी माहिती चौकशी दरम्यान पुढे आली. गांजाची निर्मीती दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर होतं असते. गेल्या सहा महिन्यात १०० कोटीहून अधिक प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. बँकाॅकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येते. अशी सीमा शुल्क विभागाने माहिती दिली.....

 

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.

ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली

विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृह, समाजकल्याण विभागाची नवीन योजना...

  मुंबई :  राज्य सरकारच्या  समाजकल्याण विभागाने (social welfare) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिताचा

पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...

पुणे : संत तुकाराम  महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्काम असणार आहे, त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक विभागाने मोठे बदल

मुंबई विद्यापीठाची सुधारणा, शिक्षण संस्थाच्या यादीत १७ व्या क्रमांकावर...

मुंबई : क्वॅकेरली सायमंडतर्फे (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी  २०२६ नुकतीच जाहीर करण्यात आली.  गतवर्षीयाच्या

Ahmedabad Plane Crash : मृतांच्या कुटुंबांना अशी मिळणार नुकसानभरपाई वैयक्तिक विमा का महत्त्वाचा जाणून घ्या.....

प्रतिनिधी: गुरूवारी दुपारी १.३० सुमारास अहमदाबाद विमान अपघातासारखी मोठी घटना घडली.ज्यामध्ये २४२ हून अधिक