Shani Temple : भाविकांसाठी महत्वाची बातमी! 'आता रात्रीचे शनिदर्शन होणार बंद'...

विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय


शनिशिंगणापूर : शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने मंदिर परिसराची स्वच्छता व सुरक्षेचे कारण पुढे करून मागच्या आठवड्यात बुधवारपासून (ता.११) रात्री १०.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत शनिचौथऱ्यावर तेल अर्पण करणे, तसेच चौथऱ्याच्या समोरून मुखदर्शन घेणे बंद केले आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्ट मालकीच्या भक्तनिवासातील अनेक खोल्यांची दुरवस्था असताना आणि गावात खासगी लाॅजमध्ये आवश्यक खोल्यांची संख्या नसताना विश्वस्त मंडळाने रात्रीचे दर्शन बंद केले. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, मुखदर्शन बंद केल्याने भाविक मुक्कामी राहू लागल्याने गावात आर्थिक उलाढाल वाढली आहे.


देवस्थान मालकीच्या तीन भक्तनिवासांमध्ये आवश्यक चांगल्या सुविधा नसल्याने व अनेक खोल्यांची दुरवस्था असल्याने भाविक जास्त असूनही बऱ्याच खोल्या रिकाम्या राहिल्या होत्या. शुक्रवारी (ता.१४) गावातील सर्व खासगी लाॅज बुक झाले होते. अनेक भाविकांना मुक्कामासाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व शिर्डीचा रस्ता गाठावा लागला.



भक्तनिवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


रात्रीचे दर्शन बंद केल्याने सध्या निवास व्यवस्थेची जास्त अडचण होत नसली, तरी नाताळ, दिवाळी, उन्हाळ्याची सुटी, सलग सुट्यांचे दिवस, तसेच शनिजयंती, श्रावण महिना, शनिपालट, शनिप्रदोष आदी काळात मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या लाॅजबरोबरच जेवण, चहा, नाश्ता व इतर व्यवसायांत वाढ झाली आहे. येथे नव्याने सरकते दरवाजे बसविलेले असले, तरी कडी-कुलपांचा वापर होत नसल्याने अनेक भक्तांची राहण्याची मानसिकता होत नसल्याचे चित्र आहे. येथे येणारे जास्त भाविक उच्चभ्रू असल्याने ते सर्वोत्तम रूमला अग्रक्रम देत असल्याने तशा रूम गावात अत्यल्प आहेत. देवस्थानचे पदाधिकारी व काही विश्वस्तांचे खासगी लाॅज असल्याने देवस्थानच्या भक्तनिवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची उघड चर्चा ग्रामस्थात आहे.


निवास स्थिती, खासगी लाॅज २२, देवस्थानचे भक्तनिवास ३, एकूण खोल्या ३५९, व्यवस्था ११२० भाविक


रात्री १०.३०नंतर जास्त भाविक आले, तर त्या प्रमाणात व्यवस्था नाही. निर्णय घेतला असल्याने लवकरच प्रसादालयावरील निवासाच्यावर एक नवीन मजला करणार आहे. एक कोटी रुपये खर्चाचे नूतनीकरण काम लवकरच हाती घेणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया