Shani Temple : भाविकांसाठी महत्वाची बातमी! 'आता रात्रीचे शनिदर्शन होणार बंद'...

विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय


शनिशिंगणापूर : शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने मंदिर परिसराची स्वच्छता व सुरक्षेचे कारण पुढे करून मागच्या आठवड्यात बुधवारपासून (ता.११) रात्री १०.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत शनिचौथऱ्यावर तेल अर्पण करणे, तसेच चौथऱ्याच्या समोरून मुखदर्शन घेणे बंद केले आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्ट मालकीच्या भक्तनिवासातील अनेक खोल्यांची दुरवस्था असताना आणि गावात खासगी लाॅजमध्ये आवश्यक खोल्यांची संख्या नसताना विश्वस्त मंडळाने रात्रीचे दर्शन बंद केले. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, मुखदर्शन बंद केल्याने भाविक मुक्कामी राहू लागल्याने गावात आर्थिक उलाढाल वाढली आहे.


देवस्थान मालकीच्या तीन भक्तनिवासांमध्ये आवश्यक चांगल्या सुविधा नसल्याने व अनेक खोल्यांची दुरवस्था असल्याने भाविक जास्त असूनही बऱ्याच खोल्या रिकाम्या राहिल्या होत्या. शुक्रवारी (ता.१४) गावातील सर्व खासगी लाॅज बुक झाले होते. अनेक भाविकांना मुक्कामासाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व शिर्डीचा रस्ता गाठावा लागला.



भक्तनिवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


रात्रीचे दर्शन बंद केल्याने सध्या निवास व्यवस्थेची जास्त अडचण होत नसली, तरी नाताळ, दिवाळी, उन्हाळ्याची सुटी, सलग सुट्यांचे दिवस, तसेच शनिजयंती, श्रावण महिना, शनिपालट, शनिप्रदोष आदी काळात मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या लाॅजबरोबरच जेवण, चहा, नाश्ता व इतर व्यवसायांत वाढ झाली आहे. येथे नव्याने सरकते दरवाजे बसविलेले असले, तरी कडी-कुलपांचा वापर होत नसल्याने अनेक भक्तांची राहण्याची मानसिकता होत नसल्याचे चित्र आहे. येथे येणारे जास्त भाविक उच्चभ्रू असल्याने ते सर्वोत्तम रूमला अग्रक्रम देत असल्याने तशा रूम गावात अत्यल्प आहेत. देवस्थानचे पदाधिकारी व काही विश्वस्तांचे खासगी लाॅज असल्याने देवस्थानच्या भक्तनिवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची उघड चर्चा ग्रामस्थात आहे.


निवास स्थिती, खासगी लाॅज २२, देवस्थानचे भक्तनिवास ३, एकूण खोल्या ३५९, व्यवस्था ११२० भाविक


रात्री १०.३०नंतर जास्त भाविक आले, तर त्या प्रमाणात व्यवस्था नाही. निर्णय घेतला असल्याने लवकरच प्रसादालयावरील निवासाच्यावर एक नवीन मजला करणार आहे. एक कोटी रुपये खर्चाचे नूतनीकरण काम लवकरच हाती घेणार आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा