Shani Temple : भाविकांसाठी महत्वाची बातमी! 'आता रात्रीचे शनिदर्शन होणार बंद'...

विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय


शनिशिंगणापूर : शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने मंदिर परिसराची स्वच्छता व सुरक्षेचे कारण पुढे करून मागच्या आठवड्यात बुधवारपासून (ता.११) रात्री १०.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत शनिचौथऱ्यावर तेल अर्पण करणे, तसेच चौथऱ्याच्या समोरून मुखदर्शन घेणे बंद केले आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्ट मालकीच्या भक्तनिवासातील अनेक खोल्यांची दुरवस्था असताना आणि गावात खासगी लाॅजमध्ये आवश्यक खोल्यांची संख्या नसताना विश्वस्त मंडळाने रात्रीचे दर्शन बंद केले. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, मुखदर्शन बंद केल्याने भाविक मुक्कामी राहू लागल्याने गावात आर्थिक उलाढाल वाढली आहे.


देवस्थान मालकीच्या तीन भक्तनिवासांमध्ये आवश्यक चांगल्या सुविधा नसल्याने व अनेक खोल्यांची दुरवस्था असल्याने भाविक जास्त असूनही बऱ्याच खोल्या रिकाम्या राहिल्या होत्या. शुक्रवारी (ता.१४) गावातील सर्व खासगी लाॅज बुक झाले होते. अनेक भाविकांना मुक्कामासाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व शिर्डीचा रस्ता गाठावा लागला.



भक्तनिवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


रात्रीचे दर्शन बंद केल्याने सध्या निवास व्यवस्थेची जास्त अडचण होत नसली, तरी नाताळ, दिवाळी, उन्हाळ्याची सुटी, सलग सुट्यांचे दिवस, तसेच शनिजयंती, श्रावण महिना, शनिपालट, शनिप्रदोष आदी काळात मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या लाॅजबरोबरच जेवण, चहा, नाश्ता व इतर व्यवसायांत वाढ झाली आहे. येथे नव्याने सरकते दरवाजे बसविलेले असले, तरी कडी-कुलपांचा वापर होत नसल्याने अनेक भक्तांची राहण्याची मानसिकता होत नसल्याचे चित्र आहे. येथे येणारे जास्त भाविक उच्चभ्रू असल्याने ते सर्वोत्तम रूमला अग्रक्रम देत असल्याने तशा रूम गावात अत्यल्प आहेत. देवस्थानचे पदाधिकारी व काही विश्वस्तांचे खासगी लाॅज असल्याने देवस्थानच्या भक्तनिवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची उघड चर्चा ग्रामस्थात आहे.


निवास स्थिती, खासगी लाॅज २२, देवस्थानचे भक्तनिवास ३, एकूण खोल्या ३५९, व्यवस्था ११२० भाविक


रात्री १०.३०नंतर जास्त भाविक आले, तर त्या प्रमाणात व्यवस्था नाही. निर्णय घेतला असल्याने लवकरच प्रसादालयावरील निवासाच्यावर एक नवीन मजला करणार आहे. एक कोटी रुपये खर्चाचे नूतनीकरण काम लवकरच हाती घेणार आहे.

Comments
Add Comment

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील