Monsoon Update : मुसळधार पावसानं अनेक ठिकाणांना झोडपलं; २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात अनेक ठिकाणांना झोडपल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, गुरुवारी (दि.१९) पहाटेपासूनच पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचेही दिसून आले आहे. भारतीय हवामान विभागानेही पुढील २ दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.


भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण किनारपट्टी आणि पावसाची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सह्याद्री पर्वत रांगेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.



कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि कोकण प्रदेशात तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट


मध्य व उत्तर भारतातील काही राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. भारताचा बराचसा भाग हा मान्सूनने व्यापला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनरपट्टी, मुंबई, ठाण्यात अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. राज्यातील कोकण, पुणे, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



पाटण तालुक्यातील पूल गेला वाहून


सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटण तालुक्यातील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे चिपळूण कराड वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाण्यासाठी भोर आणि ताम्हिणी घाटाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोल्हापूरला जायचं असल्यास रत्नागिरी आणि देवरुख या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा