जिल्ह्यातील देवकुंड, सिक्रेट पॉइंट, ताम्हणी घाट बंद

माणगावमधील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी


अलिबाग  : माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत भिरा गावाच्या हद्दीतील देवकुंड धबधबा, सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉइंट व ताम्हणी घाट हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहेत.


सिक्रेट पॉइंट या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने, तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवितहानी होऊ शकते. या कारणांमुळे १७ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.


या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे सुरू असते. तसेच पावसामुळे धोकादायक झालेले धबधबे, दऱ्यांचे कठडे, सेल्फी काढणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रिल्स व्हीडिओ बनविणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.


धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरीत्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे. धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जीवितहानी होईल, असे वागणे, वाहने अतिवेगाने व वाहतूक निर्माण होईल अशा प्रकारे चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, शेरेबाजी करणे असे कोणतेही वर्तन करणे, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे, धरण, तलाव, धबधब्याच्या १ कि.मी. परिसरात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, अत्यावश्यक सेवा वगळून प्रवेश करण्याला प्रशासनाने बंदी घातली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी