जिल्ह्यातील देवकुंड, सिक्रेट पॉइंट, ताम्हणी घाट बंद

माणगावमधील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी


अलिबाग  : माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत भिरा गावाच्या हद्दीतील देवकुंड धबधबा, सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉइंट व ताम्हणी घाट हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहेत.


सिक्रेट पॉइंट या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने, तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवितहानी होऊ शकते. या कारणांमुळे १७ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.


या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे सुरू असते. तसेच पावसामुळे धोकादायक झालेले धबधबे, दऱ्यांचे कठडे, सेल्फी काढणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रिल्स व्हीडिओ बनविणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.


धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरीत्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे. धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जीवितहानी होईल, असे वागणे, वाहने अतिवेगाने व वाहतूक निर्माण होईल अशा प्रकारे चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, शेरेबाजी करणे असे कोणतेही वर्तन करणे, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे, धरण, तलाव, धबधब्याच्या १ कि.मी. परिसरात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, अत्यावश्यक सेवा वगळून प्रवेश करण्याला प्रशासनाने बंदी घातली आहे.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या