बदलापूरकरांची स्थानकाबाहेरही कसरतच

अपुऱ्या आणि संथगतीच्या कामांमुळे प्रवाशांचे हाल


बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दी नियंत्रण आणि सुविधा उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे प्रवाशांना दिलासा मिळताना दिसत नाही. मात्र अपुऱ्या आणि संथगतीच्या कामांमुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत. सध्या पावसामुळे प्रवाशांना फलाट क्रमांक एक आणि दोन वर भिजतच उभे राहावे लागते आहे. काही ठिकाणी छप्पर असूनही ते अपुरे असल्याने एकतर पावसापासून रक्षण किंवा लोकलमध्ये जागा अशी काहीशी बदलापूरकर प्रवाशांची स्थिती आहे. तर स्थानकाबाहेरही पूर्व भागात पाणी साचत असल्याने प्रवाशांना कसरत करत स्थानक गाठावे लागते आहे. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.


बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वेच्या वतीने विविध सुविधा उभारल्या जात आहेत. फलाट क्रमांक एक शेजारी काही महिन्यांपूर्वी होम फलाट सुरू करण्यात आला. कालांतराने फलाट क्रमांक दोनवर सुविधा उभारण्यासाठी होम फलाटाला फलाट क्रमांक एकमध्ये बदलण्यात आले, तर फलाट क्रमांक एक आणि दोन जिथे दोन्ही बाजूने लोकलमधून चढता-उतरता येत होते. तिथे एकची बाजू लोखंडी जाळी लावून बंद करण्यात आली. परिणामी आता मुंबईकडे जाणाऱ्या लोकल नव्या फलाट क्रमांक एकवरून सुटतात. हा फलाट अरूंद असल्याने येथून बाहेर पडताना आणि लोकल पकडताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. येथे लोकलमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये अनेकदा खटके उडतात.



विशेष म्हणजे या फलाटावर अजूनही छप्पर बसवण्याचे काम करण्यात आलेले नाही. याच फलाटाचे मोठ्या थाटामाटात तत्कालीन केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी लोकार्पण केले होते. त्यावेळीही या फलाटावर छप्पर नव्हते. लोकार्पणाला आता वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. रेल्वेने काही ठिकाणी तात्पुरते लहान आकाराचे छप्पर टाकले आहे, तर काही ठिकाणी छप्पर लावण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी छप्पर आहे तेथून पावसात लोकल पकडताना दमछाक होते. त्यामुळे एकतर छप्पर किंवा लोकलमध्ये जागा अशी स्थिती बदलापूरकर प्रवाशांची आहे. त्यात पावसामुळे फलाट क्रमांक एकवर काही ठिकाणी चिखलाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.



स्थानकात प्रवाशांना समस्यांचा सामना करत असताना स्थानकाबाहेर पडल्यानंतरही प्रवाशांच्या समस्या संपताना दिसत नाहीत. बदलापूर स्थानकाबाहेर पूर्वेला मुख्य रस्त्यावर पाणी साचत असल्याने स्थानकातून बाहेर पडल्यानंतर लांब उड्या किंवा कठड्यावरची कसरत करावी लागते आहे, तर पश्चिमेला स्थानकातून बाहेर पडल्यानंतर थेट वाहतूक कोंडीत जाऊन प्रवासी अडकत आहेत. त्यामुळे बदलापूरकरांच्या नशिबी रेल्वे प्रवासात अडचणींची सर्कस सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.

Comments
Add Comment

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती दोन्ही पक्षांची

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर

Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या

Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिसाद पंतप्रधान

Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागात होणार परिणाम

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा (Bhiwandi Water Cut) करणाऱ्या यंत्रणेमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.