झरीखाडी पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक बंद

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन


डहाणू  : पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या तलासरी उंबरगाव मार्गावरील झरीखाडी पुलाचे काम प्रगतिपथावर असून पुलाचे काम सुरू असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पूल बंद असल्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्याचे वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र यामुळे नागरिकांना १० ते १२ किलोमीटर लांबच्या पर्यायी रस्त्याचे वापर करावा लागत असून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


तलासरी उंबरगाव रस्त्यावरील झरी खाडी पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी हा पूल पाण्याखाली जात असून यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती. अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी करण्यात येत असून अखेर या ठिकाणी नवीन पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून पर्यायी मार्ग म्हणून जुन्या पुलावर मातीचा भराव टाकून वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून अनुचित प्रकार रोखण्यासाठी या पुलावरून वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सेंबर २०२४ मध्ये नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून या पुलासाठी २२ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.


पावसाळ्याच्या पूर्वी या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराला निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे पुलाचे काम लांबल्याची माहिती देण्यात येत आहे. पावसाळ्यात पुलावरून वाहतूक बंद असल्यामुळे नागरिकांनी पर्यायी कवाडा, वसा, वेवजी, उंबरगाव या लांबच्या रस्त्याचा अवलंब करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास आणि खर्चाला सामोरे जावे लागत आहे. तलासरी तालुक्यातून संजान, उंबरगाव, वेवजी बाजूला कंपनी मधील कामगार, विद्यार्थी आणि रुग्ण प्रवास करतात.
सध्या झरीखाडी पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे कामगार, विद्यार्थी आणि रुग्णांना पर्यायी लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. तसेच तलासरी बाजूने मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहने उंबरगाव येथील औद्योगिक वसाहतीत जात असून नवीन चालकांची दिशाभूल होऊन त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Comments
Add Comment

Rain Update : गुरुवारी या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर ! २४ तासांसाठी रेट अलर्ट

Mumbai : आज सकाळपासून मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई व्यतिरिक्त ठाणे, रायगड आणि पालघर

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Palghar Accident : शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

पालघर:  पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर एक भीषण अपघात (Accident) घडला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत