RBI News: आरबीआयकडून Re Issue ची घोषणा! बँक २७००० कोटींची सिक्युरिटीज विकणार!

प्रतिनिधी: केंद्र सरकारने सरकारी सिक्युरिटीजची रि- इशू (Re Issue) करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या सिक्युरिटीजची विक्री होणार असून सरकारला या माध्यमातून २७००० कोटींचा निधी मिळणार आहे अशी घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सिक्युरिटीजची विक्री दोन टप्प्यांत होणार आहे. प्रथम टप्प्यात १५००० कोटींची ६.७५ टक्के व्याजदराने व उर्वरित १२००० कोटीची सिक्युरिटीज (Securities) ७.०९ टक्के व्याज दराने दिल्या जाणार आहेत.

नक्की रि इशू (Re Issue) म्हणजे काय?

आरबीआय जेव्हा बाजारातील अतिरिक्त बॉण्ड अथवा सिक्युरिटीज विकते. त्यातून सरकारला पैसा मिळतो. सरकार अधूनमधून अश्या पद्धतीने निधीचे संकलन करत असते.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या सिक्युरिटीजमधील अतिरिक्त २००० कोटींच्या सिक्युरिटीज आपल्याकडे राखून ठेवण्याचा पर्याय सरकारने हातात ठेवलाय. २० जूनला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या सिक्युरिटीजची बोली (Auc tion) लावणार आहे.मुख्य म्हणजे या सिक्युरिटीज बोली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने विशेषतः ई कुबेर सिस्टिम (E Kuber System) नुसार विकल्या जातील. सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत गैर स्पर्धात्मक पद्धतीने (Non Competitive Bids) बोली लागतील. तर स्पर्धात्मक बोली (Competitive Bids) सकाळी १०.३० ते ११.०० दरम्यान खुल्या असतील.

या दोन्ही पद्धतीच्या बोलीचा निकाल आरबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल असे आरबीआयने म्हटले. २० जूनला हा निकाल असणार आहे. व यशस्वी गुंतवणूकदारांने खरेदी किंमत २३ जूनला भरायची आहे. याच दिवशी रि इशू होईल अस आरबीआयने म्हटलंय. या सिक्युरिटीजवरील व्याजदर हा सिक्युरिटीजचा किरकोळ (Nominal) किंमतीवर खरेदी केलेल्या तारखेपासून ते शेवटच्या कूपन पेमेंट (Coupon Payment) तारखेपर्यंत मिळणार आहे. यापूर्वी सेंट्रल बँकेने याच महिन्यात ३२००० कोटींची सिक्युरिटीज रि इशू करणार असल्याचे घोषित केले होते.

रि- इशू पुन्हा जारी केल्यानंतर विद्यमान चलनाच्या आधारे सरकारला अतिरिक्त युनिट विकण्याची संधी मिळते व बाजारातील तरलता (Liquidity) या आधारे नियंत्रित करता येते.
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र