तरुणीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद

  43

विरार : वसई येथील २० वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळेच दीड महिन्याच्या कालावधीनंतरही आरोपी आणि त्याचा मुलगा फरार आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी वसई पोलीस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.



वसई येथे राहणाऱ्या रेवती निळे (२०) या तरुणीने २८ एप्रिल रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तिचा प्रियकर आयुष राणा याने तिला लग्नाला नकार दिला, तसेच मांत्रिक असलेले आयुषचे वडील अजय राणा यांनी तिला तू खालच्या जातीची आहेस, तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे असे म्हटले होते, असा आरोप रेवतीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात वसई पोलिसांनी विलंबाने गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अद्यापही अटक केली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी वसई पोलीस ठाण्यात भेट दिली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप दमानिया यांनी यावेळी केला. आरोपी हा तांत्रिक असून, त्याचे पोलिसांची संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.
Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

सफाळे: पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने

सुविधा, लाभकरांसाठी ‘मुहूर्त’ सापडेना !

नागरिकांमध्ये मात्र संभ्रम कायम विरार : वसई-विरार शहर पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिका क्षेत्रात

पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

भात रोपांची पेरणी लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला पालघर : पालघर जिल्ह्यात १६ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने जोरदार

चला... विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला!

पालघर: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याकरिता एसटी प्रशासनाकडून राज्यात

आदिवासी विद्यार्थ्यांना २४ कोटींची शिष्यवृत्ती

४२ हजार विद्यार्थ्यांना मिळाला लाभ पालघर: पालघर जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या ४२ हजार ४३६ आदिवासी

हॉटेल, ढाब्यांवरील वायू प्रदूषणाकडे महानगरपालिका करतेय डोळेझाक !

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांकडे दुर्लक्ष विरार : हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि बेकऱ्यांमध्ये होत असलेला