तरुणीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद

विरार : वसई येथील २० वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळेच दीड महिन्याच्या कालावधीनंतरही आरोपी आणि त्याचा मुलगा फरार आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी वसई पोलीस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.



वसई येथे राहणाऱ्या रेवती निळे (२०) या तरुणीने २८ एप्रिल रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तिचा प्रियकर आयुष राणा याने तिला लग्नाला नकार दिला, तसेच मांत्रिक असलेले आयुषचे वडील अजय राणा यांनी तिला तू खालच्या जातीची आहेस, तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे असे म्हटले होते, असा आरोप रेवतीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात वसई पोलिसांनी विलंबाने गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अद्यापही अटक केली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी वसई पोलीस ठाण्यात भेट दिली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप दमानिया यांनी यावेळी केला. आरोपी हा तांत्रिक असून, त्याचे पोलिसांची संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.
Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील