तरुणीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद

विरार : वसई येथील २० वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळेच दीड महिन्याच्या कालावधीनंतरही आरोपी आणि त्याचा मुलगा फरार आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी वसई पोलीस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.



वसई येथे राहणाऱ्या रेवती निळे (२०) या तरुणीने २८ एप्रिल रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तिचा प्रियकर आयुष राणा याने तिला लग्नाला नकार दिला, तसेच मांत्रिक असलेले आयुषचे वडील अजय राणा यांनी तिला तू खालच्या जातीची आहेस, तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे असे म्हटले होते, असा आरोप रेवतीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात वसई पोलिसांनी विलंबाने गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अद्यापही अटक केली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी वसई पोलीस ठाण्यात भेट दिली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप दमानिया यांनी यावेळी केला. आरोपी हा तांत्रिक असून, त्याचे पोलिसांची संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.
Comments
Add Comment

नगराध्यक्ष हरले, मात्र जिल्हाध्यक्ष जिंकले

जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

टिळक भवनात आज काँग्रेसची खलबते वसई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी