Indian Economy: जागतिक आर्थिक संकटातही भारताने चांगला विकास दर राखला - मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेस्वरन

प्रतिनिधी: जगभरात प्रतिकूल परिस्थिती असतानाही भारताने चांगला विकास दर राखला आहे असे प्रतिपादन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेस्वरन यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, 'सध्याच्या संकटाच्या काळातही भारत चांगल्या प्रकारे मार्गेक्रमण करत आहे. जागतिक स्थिती अस्थिरत असतानाही आपण चांगली कामगिरी करत आहोत. राजकीय व आर्थिक स्थिती पाहता विकास दर वाढीसाठी अनुकूल नाही. अजूनही अस्थिरता कायम आहे त्यामुळे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकीला तत्काळ स्थगिती देऊ शकतात 'असे त्यांनी यापुढे म्हटले आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.


जागतिक बँकेच्या अहवालावर बोलताना ते म्हणाले की, ' सध्या आताच सांगणे कठीण आहे की आताची परिस्थिती २००८ आर्थिक मंदीसारखी आहे का? मला नाही वाटत २००९ सारखी जागतिक मंदी पातळी आता आहे.गेल्या ७ वर्षातला विकास दरवृद्धीसाठी हा संथ काळ आहे. काही विशिष्ट बाबतीत २००८ वैश्विक मंदीपेक्षा प्रतिकूल प्रभाव असू शकतो मात्र हा पुढेही पसारू शकतो.'


यापुढे त्यांनी म्हटले होते की, सध्याची एकत्रित परिस्थिती पाहता,भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६.५% विकासदर कायय राखला आहे व आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा दर ६.३ ते ६.८% पातळीवर राहू शकतो असा आमचा अंदाज आहे.'


जागतिक व्यापार (Trading) परिस्थितीवर सकारात्मक भाष्य करताना नागेस्वर न म्हणाले, ' आपली जागतिक मुत्सद्दीपणा, पेट्रोलियम मंत्रालय, पंतप्रधान मोदींचे प्रयत्न, परराष्ट्र मंत्रालय यांच्या एकत्रित परिणाम म्हणून निश्चित आहे की भारतीय उर्जा क्षेत्रात पुरवठा प्रभावित होणार नाही. आपली जगभरातील प्रतिमा आश्वासक असल्याने आपण उत्तम मध्यस्थ (Mediator) आहोत. त्यामुळे प्रत्येक जगातील देशाला भारताच्या प्रतिष्ठेशी संलग्न व्हायचे आहे.'


आर्थिक स्थितीवर बोलताना ते पुढे म्हणाले,' व्यापाऱ्यांच्या घडामोडी बघताना भारत आयात शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे जेणेकरून घरगुती उत्पादनाच्या किंमतीही नियंत्रणात राहतील. जागतिक परिस्थितीचा फायदा घेताना आपल्या देशात शिक्षण, कौशल्य विकास,खनिज उत्पादन यावर गुंतवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.भारताचे उत्पादन,सेवा क्षेत्रातील प्राथमिक अस्तित्व आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे' असे त्यांनी म्हटले.


दरम्यान नुकताच जागतिक बँकेचा अहवाल प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकीय आर्थिक स्थितीबाबत व्यक्त होताना जागतिक अर्थव्यवस्थेवरही विस्तृत भाष्य केले होते. अहवालात म्हटल्याप्रमाणे, यंदा २००८ साली उद्भवलेल्या जागतिक मंदीची नांदी दिसून येते. त्यावर भाष्य करताना भारताचे मुख्य आर्थिक वर्ष संपल्यानंतर व्ही अनंथ नागेस्वरन यांनी भारताची जागतिक संकटाच्या काळातही होणारी आर्थिक प्रगती ठळकपणे मांडली.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 Firing : फिफा विश्वचषक २०२६ च्या पूर्वी अमेरिकेतील इंग्लंडच्या बेस कॅम्पजवळ गोळीबार; ९ जण जखमी

वॉशिंग्टन : फिफा विश्वचषक २०२६ च्या (FIFA World Cup 2026 Firing) सुरुवातीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अमेरिकेत घडलेल्या एका

Share Market Early Trade : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजार दबावाखाली; सेन्सेक्स-निफ्टी घसरले

मुंबई : आज सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत शेअर बाजार (Share Market) दबावाखाली राहिला. व्यवहारांची सुरुवात मोठ्या

WHATSAPP UPDATE : व्हॉट्सॲपवर आता फसवणूक होणार कठीण; लवकरच येत आहे 'स्कॅम अलर्ट' फीचर!

Whatsapp New Features : आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप हे केवळ संवादाचे साधन राहिले नसून ती आपली एक गरज बनली आहे. मात्र, याच

Thane Municipal Corporation Fire : ठाणे महापालिकेत भीषण आग; २०० कोटींच्या TDR फाईल्स जळून खाक?

- नगरविकास विभागात खळबळ ठाणे : ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation Fire) मुख्यालयातील नगरविकास विभागात लागलेल्या आगीमुळे

Chhagan Bhujbal : मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का नहीं!

मंत्री छगन भुजबळ; 'पक्षात मी नाराज नाही, इतरांना न्याय मिळाला तसा मलाही मिळावा' मुंबई : "राज्यसभेच्या उमेदवारीवरून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळली, २५ प्रवासी जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. रविवारी मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ झालेल्या